शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेशन दुकानांत होणार माफक दराने कांदाविक्री; केंद्र सरकारची राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:15 IST

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कांद्याचे भाव ३९ ते ४० रुपये किलो आहेत. काही विक्रेते कांद्याच्या गुणवत्तेनुसार तो ५० रुपये किलो दरानेही विकतात.

नवी दिल्ली : दिल्लीत दिवसेंदिवस कांद्याचा दर वाढतच असून त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने अतिरिक्त साठ्यातील कांद्याची नागरी पुरवठा विभागाच्या मदतीने रेशन दुकानांत माफक दराने विक्री करण्याच्या सूचना दिल्ली सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार प्रतिकिलो कांद्याचा दर २३.९० रुपये असणार आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दिल्ली आणि आसपासच्या परिसरात कांद्याचे भाव ३९ ते ४० रुपये किलो आहेत. काही विक्रेते कांद्याच्या गुणवत्तेनुसार तो ५० रुपये किलो दरानेही विकतात. सरकारने सूचना केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड), भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ) आणि मदर डेअरी यांच्याकडील अतिरिक्त साठ्यातील कांदा घेऊन तो रेशन दुकानांकडे देण्यात येणार आहे.

मदर डेअरीकडून काही दुकानांमध्ये कांदा २३.९० रुपये किलो दराने विकला जात आहे. ग्राहकसंबंधी मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्राकडील अतिरिक्त साठ्यातील कांदा ग्राहक विभाग आणि रेशन दुकानांच्या माध्यमांतून विकण्याचा राज्य सरकारला आग्रह करण्यात आला आहे. राज्याकडून कमाल २३.९० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जात आहे. केंद्राकडील साठ्यातील कांदा १५ ते १६ रुपये किलो दराने दिला जात आहे.

दिल्लीत दररोज ३५० टन कांद्याची आवश्यकता आहे. तर एनसीआरला दररोज ६५० टन कांद्याची आवश्यकता असते. केंद्राकडून या वर्षी ५६ हजार टन कांदा साठवण्यात आला आहे. त्यातील आतापर्यंत १० हजार ते १२ हजार टन कांद्याची नाफेड, एनसीसीएफ आणि मदर डेअरीकडून विक्री करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील उत्पादन घटल्याने महाग

  1. खरीप कांद्याचे उत्पादन यंदा कमी झाल्यामुळे कांदा महागला आहे. त्याचप्रमाणे प्रमुख उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादनातही दहा टक्क्यांनी घट झाल्यामुळे कांदा महागला आहे.
  2. दरवर्षी महाराष्ट्रातून दिल्लीला मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात होते.
टॅग्स :onionकांदाCentral Governmentकेंद्र सरकार