शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

१२ राज्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:14 IST

आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या धोरणाला १२ राज्यांचा विरोध

हरीश गुप्तानवी दिल्ली : भारतीय प्रशासन सेवेच्या प्रतिनियुक्ती बाबतच्या नियमांत दुरुस्ती करण्याची घाई केंद्र सरकारला कदाचित करता येणार नाही कारण त्या नियोजित प्रस्तावाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोओ) सरकार नसलेल्या महाराष्ट्रासह १२ राज्यांनी विरोध केलेला आहे. आयएएस अधिकाऱ्यांनी राज्यांतून केंद्रात नियुक्तीवर येण्यास भाग पाडणाऱ्या केंद्र सरकारच्या मनमानी धोरणाला ९ राज्यांनी पूर्णपणे विरोध केला आहे. ३ राज्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर आपला दृष्टिकोन बदलून घेण्याची तयारी दाखवली आहे. कर्नाटक, मेघालय आणि बिहारने आधी विरोध केला होता. नंतर त्याचा फेरविचार करण्यास संमती दिली.

नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला होता परंतु ९ प्रमुख राज्यांच्या रांगेत ओडिशा सरकार उभे राहिल्यावर सरकारला आपले पाऊल मागे घ्यावे लागले. केंद्र सरकारचे हे नवे धोरण घटनेच्या संघ रचनेचे उल्लंघन असल्याचे या राज्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करून २५ जानेवारीच्या आधी औपचारिक पत्रही पाठवले जाणार होते. 

१२ जानेवारीच्या पत्राने निर्माण झाला वादn    पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, झारखंड अशा राज्यांच्या यादीत तेलंगण ही उभे राहिल्यावर केंद्र सरकारला आश्चर्य वाटले. ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशने केंद्र सरकारला औपचारिक पत्र लिहून आपला दृष्टिकोन कळविला आहे. n    कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने राज्यांना १२ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्राने वाद निर्माण झाला आहे. आयएएस (केडर) रूल्स, १९५४ मध्ये दुरुस्तीचा  विचार असल्याचे त्यात म्हटले होते.

टॅग्स :GovernmentसरकारState Governmentराज्य सरकार