शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शाहीन बागेचा रस्ता अ‍ॅम्बुलन्ससाठी खुला केला; आंदोलनामुळे दोन महिन्यांपासून होता बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 14:36 IST

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळील बॅरीकेड्स हटविले.

ठळक मुद्देबदरपूरला जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 20 मिनिटांच्या मार्गासाठी अडीज तास लागत होते. एक रस्ता खुला करण्यात आल्याने दोन महिन्यांपासून त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलनामुळे तेथील रस्ते बंद झाले होते. आज अखेर एक रस्ता खुला करण्यात आल्याने दोन महिन्यांपासून त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. फरिदाबाद आणि जेतपूरकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांवरील बॅरिकेड्स पोलिसांनी हटविले आहेत. मात्र, आंदोलकांनी कालिंदीकुंजचा रस्ता अद्यापही बंद करून ठेवला आहे. दरम्यान पोलिसांनी अॅम्बुलन्ससाठी काही वेळ रस्ता खुला केल्याचा खुलासा केला.

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ओखला पक्षी विहारजवळील बॅरीकेड्स हटविले. यामुळे बदरपूरला जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लोकांना मदनपूर खादर मार्गावरून जावे लागत होते. त्यांचा मोठा वळसा आता वाचणार आहे. तर फरीदाबादला जाण्यासाठी लोकांना डीएनडीद्वारे आश्रमवरून कित्येक किमी फिरून जावे लागत होते. 

मदनपूर खादर रस्त्यावरून जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. मात्र, रस्ता बंद असल्याने त्यांना जाण्यासाठी अडीज तास लागत होते. आता रस्ता खुला केल्याने बदरपूर, जैतपूरला राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोएडा पोलिसांना हा रस्ता बंद करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आंदोलक या रस्त्यापासून खूप दूर अंतरावर बसलेले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

मात्र, आंदोलकांमुळे शाहीन बागेहून कालिंदीकुंजला जाणारा रस्ता क्रमांक 13A बंदच आहे. यामुळे नोएडाच्या बाजुने 500 मीटर अंतरावर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी 13 डिसेंबरपासून आंदोलन सुरु आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलनdelhiदिल्ली