शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 20:37 IST

राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेल्या तरुणांना राजकारणात आणण्याची घोषणा पीएम मोदींनी केली आहे.

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(20 ऑक्टोबर 2024) आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये 6700 कोटी रुपयांचे 23 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. दरम्यान, यावेळी भाषणात त्यांनी कुटुंबवादाची मानसिकता नष्ट करण्यासाठी एक मोठी घोषणा केली. 'आम्ही राजकीय घराण्याशी कुठलाही संबंध नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात आणणार आहोत', असे मोदी यावेळी म्हणाले. 

कुटुंबवादावर प्रहार करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला आहे, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल. आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही.

आम्ही जे बोलतो, ते करुन दाखवतो...आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा वाराणसी दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले आणि शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली. आपल्या भाषणात राम मंदिराच्या उभारणीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, 'आम्ही जे बोलतो, ते कुठल्याही परिस्थितीत करुन दाखवतो. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते आणि ते आम्ही करुन दाखवले. आज लाखो लोक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत.'

संपूर्ण देशाचा आशीर्वाद मिळालामोदी पुढे म्हणतात, 'आमच्या सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केले आहे. सरकारने कोणाचा हक्क हिरावून घेतलेला नाही, उलट गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचे कामही केले आहे एनडीए सरकार जे काही करत आहे, त्याला संपूर्ण देश आशीर्वाद देत आहे. हरयाणात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला विक्रमी मते मिळाली.' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश