शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

प्लास्टिकचा वापर करून बनविले एक लाख किलोमीटरचे पक्के रस्ते, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, रस्त्याच्या खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:19 IST

डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे.

नवी दिल्ली : प्लास्टिकच्या कच-याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अनोखा मार्ग शोधून काढला आहे. प्लास्टिकपासून चक्क पक्के रस्ते बनविण्यात येत असून, आतापर्यंत असे एक लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात आले आहेत. याद्वारे दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. एक म्हणजे प्लास्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणारा एक उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. दुसरे म्हणजे, रस्ते बांधण्याच्या खर्चात काही प्रमाणात बचत झाली आहे.डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी  वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे रस्त्यांच्या बांधकामाच्या खर्चातही मोठी बचत होत आहे. रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २0१६ मध्ये केली होती. आतापर्यंत ११ राज्यांतील एक लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांत प्लास्टिक वापरले गेले आहे. गुरुग्रामच्या महापालिकेने २0१८ मध्ये पहिल्यांदा रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर केला. आसामने यंदाच प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. २७0 कि.मी. लांबीच्या जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महार्गासाठी प्लास्टिकचा वापर केला गेला आहे. दिल्ली-मेरठच्या दोन कि.मी. पट्ट्यासाठी १.६ टन प्लास्टिक वापरले गेले. दिल्ली विमानतळाला जोडणाºया धौला कुँवा रस्त्याच्या बांधकामातही प्लास्टिक वापरले.दररोज तयार होतो २५,९४0 टन प्लास्टिक कचराभारतात दररोज २५,९४0 टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा ४,३00 हत्तींच्या वजनाएवढा आहे. यातील ६0 टक्के कचरा रिसायकल होतो. बाकीचा जमिनीवरच पडून राहतो. हाच कचरा मग ड्रेनेज तुंबवतो, मायक्रो प्लास्टिकच्या स्वरूपात समुद्रात जातो. काही कचरा जाळला जातो. त्यातून वायुप्रदूषण होते.रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे प्लास्टिक कचºयाची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिकचा वापर आणखी वाढल्यास ही समस्या कमी होईल.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकIndiaभारत