शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

प्लास्टिकचा वापर करून बनविले एक लाख किलोमीटरचे पक्के रस्ते, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, रस्त्याच्या खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:19 IST

डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे.

नवी दिल्ली : प्लास्टिकच्या कच-याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अनोखा मार्ग शोधून काढला आहे. प्लास्टिकपासून चक्क पक्के रस्ते बनविण्यात येत असून, आतापर्यंत असे एक लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात आले आहेत. याद्वारे दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. एक म्हणजे प्लास्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणारा एक उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. दुसरे म्हणजे, रस्ते बांधण्याच्या खर्चात काही प्रमाणात बचत झाली आहे.डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी  वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे रस्त्यांच्या बांधकामाच्या खर्चातही मोठी बचत होत आहे. रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २0१६ मध्ये केली होती. आतापर्यंत ११ राज्यांतील एक लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांत प्लास्टिक वापरले गेले आहे. गुरुग्रामच्या महापालिकेने २0१८ मध्ये पहिल्यांदा रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर केला. आसामने यंदाच प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. २७0 कि.मी. लांबीच्या जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महार्गासाठी प्लास्टिकचा वापर केला गेला आहे. दिल्ली-मेरठच्या दोन कि.मी. पट्ट्यासाठी १.६ टन प्लास्टिक वापरले गेले. दिल्ली विमानतळाला जोडणाºया धौला कुँवा रस्त्याच्या बांधकामातही प्लास्टिक वापरले.दररोज तयार होतो २५,९४0 टन प्लास्टिक कचराभारतात दररोज २५,९४0 टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा ४,३00 हत्तींच्या वजनाएवढा आहे. यातील ६0 टक्के कचरा रिसायकल होतो. बाकीचा जमिनीवरच पडून राहतो. हाच कचरा मग ड्रेनेज तुंबवतो, मायक्रो प्लास्टिकच्या स्वरूपात समुद्रात जातो. काही कचरा जाळला जातो. त्यातून वायुप्रदूषण होते.रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे प्लास्टिक कचºयाची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिकचा वापर आणखी वाढल्यास ही समस्या कमी होईल.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकIndiaभारत