शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

मुले पळवण्याची अफवा : जमावाच्या मारहाणीत गुगलच्या इंजिनिअरचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 11:57 IST

मुले पळविण्यास आल्याच्या संशयावरून बिदर जिल्ह्याच्या औराद तालुक्यातील मुरकी गावात संतप्त जमावाकडून शुक्रवारी रात्री एका प्रवाशाची हत्या करण्यात आली, तर दोघांना जखमी केले.

बिदर (कर्नाटक): मुले पळविण्यास आल्याच्या संशयावरून बिदर जिल्ह्याच्या औराद तालुक्यातील मुरकी गावात संतप्त जमावाकडून शुक्रवारी रात्री एका प्रवाशाची हत्या करण्यात आली, तर दोघांना जखमी केले. पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव मोहम्मद आझम व जखमींची नावे ेतल्हा इस्माइल व मोहम्मद सलमान अशी आहेत. हे तिघेही हैदराबादचे होते. मोहम्मद बशीर या मित्रासोबत हे तिघेही बशीरच्या औराद तालुक्यातील मुडीरका गावी मोटारीने जात होते. दरम्यान, मारहाणीत मृत्युमुखी पडलेला मोहम्मद आझम हा गुगलचा इंजिनिअरला होता, अशी माहिती समोर आली आहे. 

हे तिघंही जण वाटेत ते बालकुट तांडा येथे चहापाण्यासाठी थांबले. हॉटेलच्या जवळून जाणाऱ्या लहान मुलांना बोलावून त्यांनी चॉकलेट्स दिली. त्यावरून ते मुले पळविणारे असावेत, असा गावक-यांनी संशय घेतला गेला. गावातील सर्वांनी जमून त्यांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. अशाच कारणास्तव महाराष्ट्रात जळगावच्या राईनपाडा येथे पाच जणांची हत्या करण्यात आली होती. आसाम, तसेच त्रिपुरा या दोन राज्यांतही मुले पळविण्याच्या संशयातून काही जणांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यापैकी काही प्रकार सोशल मीडियातील अफवांमुळे घडल्याचे उघडकीस आले आहे. (वृत्तसंस्था)