शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींनी साधे राहणीमान स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण; हुतात्मा कनकलता यांना देशाचे अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 06:54 IST

दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले. 

 

नवी दिल्ली :भारतातील गरीब लोक जसा वेश परिधान करतात तसेच आपणही राहायचे असे ठरवून महात्मा गांधी यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी आपल्या गुजराती वेशभूषेचा त्याग केला व ते पंचा नेसू लागले. या ऐतिहासिक घटनेला बुधवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. आसाममधील स्वातंत्र्यसेनानी कनकलता बरूआ या एका पोलीस ठाण्यावर २० सप्टेंबर १९४२ रोजी ध्वज फडकविण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली. देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, या ऐतिहासिक घटनांचे देशभरात स्मरण केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी देशभर दौरा करून जनतेच्या स्थितीची पाहणी केली होती. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले. 

- देशातील गरीब जनता किती हालअपेष्टांमध्ये जगते आहे हे खूप जवळून पाहिल्यानंतर गांधीजींनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले. त्यांनी गुजराती पोशाखाचाही त्याग केला. निव्वळ पंचा नेसून यापुढे राहायचे असा निर्धार त्यांनी केला. - या अतिशय साध्या वेशात ते पहिल्यांदा मदुराई येथे   २२ सप्टेंबर १९२१     रोजी वावरले. तिथे त्यांनी भाषणही केले. - ती जागा गांधीजी पोट्टल म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली. 

महत्त्वाच्या घटनांना उजाळास्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आसाममध्ये एका पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याच्या प्रयत्नात असताना कनकलता बरुआ या अवघ्या १७ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसेनानी २० सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला जात आहे. त्यानुसार महात्मा गांधी व कनकलता बरुआ यांच्याशी संबंधित घटनांचे स्मरण करून त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आले.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत