शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उत्तर प्रदेशमध्येही एकावर एक दारु बॉटल देण्यास सुरुवात; 31 मार्चपर्यंत साठा संपविण्याची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 19:34 IST

सरकारच्या नवीन दारू धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नशेबाजांची चंगळ झाली असून दारु दुकानांसमोर मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत.

उत्तर प्रदेशच्या दारु विक्रेत्यांसमोर मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. तिथे आता दिल्ली सारखी एकावर एक दारु विक्री करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत यावरून अबकारी कर घोटाळा उघड झाला होता. उत्तर प्रदेशमध्येही योगी सरकारच्या एका निर्णयामुळे दारु विक्रेत्यांना हे करावेच लागत आहे. 

सरकारच्या नवीन दारू धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नशेबाजांची चंगळ झाली असून दारु दुकानांसमोर मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. दारू दुकानांसाठी नवीन निविदा जारी करण्यात आल्या आहेत आणि हे धोरण ३१ मार्चपासून लागू केले जाणार आहे. आता सध्या स्टॉकमध्ये असलेली दारू या तारखेनंतर विकता येणार नाही.

लखनौसह अनेक शहरांमध्ये, दारूच्या दुकानांबाहेर मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ग्राहकांना मोठ्या सवलती आणि एक बाटली खरेदी करा एक मोफत मिळवा अशा योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. दुकानदारांच्या यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. ३१ मार्चनंतर दुकानदार उरलेली दारु विकू शकणार नाहीत, असे ते म्हणत आहेत. 

सरकारने हा साठा परत घेतला नाही तर त्यांना उर्वरित माल नष्ट करावा लागेल, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे नष्ट करून नुकसान करून घेण्यापेक्षा दारूवर मोठी सूट देऊन पैसे काढले जात आहेत. हे व्यापारी कोर्टात गेले आहेत. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने सरकारला निर्णय घेण्यास सांगितले आहे. तरीही सरकारने यावर निर्णय घेतला नसल्याचा आरोप दारू असोसिएशनने केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश