शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप मोठा अन्याय केला, नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 14:16 IST

अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर मोदींनी एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यासोबत खूप अन्याय केलं असल्याचं सांगत काँग्रेसवर टीका केली. 

धंधुका - गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोपतरी प्रयत्न करत असून एकामागोमाग एक सभा पार पडत आहेत. बुधवारी अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली. यावेळी नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर मोदींनी एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यासोबत खूप अन्याय केलं असल्याचं सांगत काँग्रेसवर टीका केली. 

राहुल गांधींच्या धर्मावरुन झालेल्या वादानंतर आता अयोध्या प्रकरणानेही गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वोच्च न्यायालयात सुन्नी वक्फ बोर्डातर्फे कपिल सिब्बल यांनी अयोध्या प्रकरणावरील सुनावणी टाळण्याची मागणी करण्यावरुन जोरदार हल्ला चढवला. 'कपिल सिब्बल मुस्लिमांकडून लढत आहेत यावर माझा काहीच आक्षेप नाही. पण पुढील निडणुकीपर्यंत अयोध्या प्रकरणावरील अंतिम सुनावणी घेऊ नये असं ते कसं म्हणू शकतात. याचा लोकसभा निवडणुकीशी काय संबंध ? 2019 ची निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार आहे की सुन्नी वक्फ बोर्ड ?', असे अनेक प्रश्न नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित केले. 

यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा तिहेरी तलाकचा मुद्दा उपस्थित केला. 'तिहेरी तलाक मुद्द्यावर मी शांत बसणार नाही हे स्पष्ट आहे. हा महिलांच्या अधिकाराचा मुद्दा आहे. आधी माणुसकी येते, आणि नंतर निवडणूक', असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'जेव्हा तिहेरी तलाकचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात होता आणि सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करायचं होतं तेव्हा काही वर्तमानपत्रांनी मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीमुळे शांत बसतील असा दावा केला होता. लोकांनी मला शांत राहा नाहीतर निवडणुकीत पराभव होईल असा सल्ला दिला होता. पण मी शांत बसणार नाही हे स्प्ष्ट होतं. प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी संबंधित नसते', असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

राहुल गांधींच्या मंदिर दर्शनावर टीका करत नरेंद्र मोदींनी मंदिरात गेल्यामुळे गुजरातमध्ये वीज आली नाही असा टोला लगावला. 'मंदिरांमध्ये जाऊन जाऊन गुजरातमध्ये वीज आलेली नाही. मी इतकी वर्ष काम करत होतो, हातात माळ घेऊन जप करत बसलो नव्हतो', अशी टीका मोदींनी केली. सोबतच विरोधकांवर हल्ला करत निवडणुकीसाठी मी निर्णय घेत नसल्याचं सुनावलं. 

 

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद भूमी विवाद प्रकरणी दाखल झालेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 8 फेब्रुवारीला पुढील सुनावणी करणार आहे. 2010 सालच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विविध पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस.ए.नजीब यांनी पक्षकारांच्या वकिलांना सर्व आवश्यक कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017