शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गोहत्येच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:53 IST

झारखंडमधील घटना; दोन जण गंभीर जखमी

खुंटी : गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत एका दिव्यांग इसमाचा बळी गेला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यामध्ये रविवारी हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.जलतंगा गावी नदीच्या किनारी कलंतूस बार्ला, फागू कच्छप, फिलीप होरो या तिघांना गायीच्या मृतदेहासह गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने केलेल्या जबर मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यातील कलंतूस बार्ला याला रुग्णालयात नेले जात असताना तो वाटेतच मरण पावला. फागू, फिलीप या दोन जखमींना रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाच जणांंना सोडून द्यावे, अशी मागणी करीत गावकऱ्यांनी कर्रा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. गुन्ह्यात कोणताही सहभाग न आढळल्यास या पाच जणांना सोडण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋषभ झा यांनी संतप्त गावकºयांना दिल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.या मारहाणीत पाच जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वेणुकांत होमकार यांनी सांगितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी तपासणी केली असता पोलिसांना गायीचा मृतदेह आढळून आला नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (वृत्तसंस्था)हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशीदेशामध्ये गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने जबर मारहाणीद्वारे एखाद्या व्यक्तीचा बळी घेण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत.मोदी सरकारच्या काळात अशा प्रकारांना बळ मिळत असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी याआधी केला होता.झारखंडमध्ये जादूटोणा केल्याच्या, तसेच गोहत्येच्या संशयावरून एखाद्याला मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार घडत असतात. त्यांना आळा घालण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचीही टीका होत आहे.

टॅग्स :Lynchingलीचिंग