शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

‘एक देश, एक निवडणूक’ घेण्यासाठी हवे दीड वर्ष, आवश्यक सामुग्रीसाठी लागणार १५ हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:58 IST

One Nation, One Election: देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल.

- संजय शर्मानवी दिल्ली  - देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल. लोकसभा आणि विधानसभेसोबतच नगरपालिका आणि पंचायत निवडणुका घेण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेवर मंथनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती पक्ष व सामाजिक संघटनांकडून यावर अभिप्राय घेत असून, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह १७पक्षांनी याला विरोध केला आहे. केंद्र सरकारने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीबाबत निवडणूक आयोगाकडून या महिन्याच्या सुरुवातीला सविस्तर अहवाल मागवला होता. सध्या आयोग साधनसामग्रीचा आढावा घेत आहे. 

लोकसभा व विधानसभा एकाच वेळी घेतली जाऊ शकते; पण तयारीसाठी आयोगाला किमान दीड वर्षाचा अवधी लागणार आहे. किमान ३० लाख ईव्हीएम, ४३ लाख बॅलेट संच आणि ३२ लाख व्हीव्हीपॅट यंत्रे लागतील. ही यंत्रे बनविणाऱ्या ईसीआयएल आणि बीईएल या कंपन्यांना आगाऊ ऑर्डर द्यावी लागेल. 

देशातील अंदाजे १२.५० लाख मतदान केंद्रांसाठी १५ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅट लागणार आहेत. निवडणूक आयोगाला आजच ३५ लाख संचांचा तुटवडा जाणवत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास एका मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम यंत्रे ठेवावी लागतील, तसेच राखीव संचही सज्ज ठेवावे लागतील. या यंत्रांवर १५ हजार कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.  

कराव्या लागणार पाच घटनादुरुस्ती - ऑगस्ट २०१८ मध्ये मोदी सरकारने विधि आयोगाकडे एकाच वेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर विधि आयोगाने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने या योजनेचा कृती आराखडा तयार केला आहे. कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल व इतर सदस्यांचा समावेश आहे.- या समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. एकाचवेळी निवडणुकांसाठी पाच घटना दुरुस्त्या करण्याची गरज असून, त्यावरही विचार सुरू आहे. १९५२ पासून १९६७ पर्यंत देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. मात्र, नंतर यात बदल झाला. 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग