शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘एक देश, एक निवडणूक’ घेण्यासाठी हवे दीड वर्ष, आवश्यक सामुग्रीसाठी लागणार १५ हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:58 IST

One Nation, One Election: देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल.

- संजय शर्मानवी दिल्ली  - देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल. लोकसभा आणि विधानसभेसोबतच नगरपालिका आणि पंचायत निवडणुका घेण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेवर मंथनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती पक्ष व सामाजिक संघटनांकडून यावर अभिप्राय घेत असून, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह १७पक्षांनी याला विरोध केला आहे. केंद्र सरकारने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीबाबत निवडणूक आयोगाकडून या महिन्याच्या सुरुवातीला सविस्तर अहवाल मागवला होता. सध्या आयोग साधनसामग्रीचा आढावा घेत आहे. 

लोकसभा व विधानसभा एकाच वेळी घेतली जाऊ शकते; पण तयारीसाठी आयोगाला किमान दीड वर्षाचा अवधी लागणार आहे. किमान ३० लाख ईव्हीएम, ४३ लाख बॅलेट संच आणि ३२ लाख व्हीव्हीपॅट यंत्रे लागतील. ही यंत्रे बनविणाऱ्या ईसीआयएल आणि बीईएल या कंपन्यांना आगाऊ ऑर्डर द्यावी लागेल. 

देशातील अंदाजे १२.५० लाख मतदान केंद्रांसाठी १५ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅट लागणार आहेत. निवडणूक आयोगाला आजच ३५ लाख संचांचा तुटवडा जाणवत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास एका मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम यंत्रे ठेवावी लागतील, तसेच राखीव संचही सज्ज ठेवावे लागतील. या यंत्रांवर १५ हजार कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.  

कराव्या लागणार पाच घटनादुरुस्ती - ऑगस्ट २०१८ मध्ये मोदी सरकारने विधि आयोगाकडे एकाच वेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर विधि आयोगाने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने या योजनेचा कृती आराखडा तयार केला आहे. कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल व इतर सदस्यांचा समावेश आहे.- या समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. एकाचवेळी निवडणुकांसाठी पाच घटना दुरुस्त्या करण्याची गरज असून, त्यावरही विचार सुरू आहे. १९५२ पासून १९६७ पर्यंत देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. मात्र, नंतर यात बदल झाला. 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग