शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
2
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
3
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
5
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
6
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
7
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
8
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
9
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
10
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
11
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
12
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
13
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
14
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
15
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
16
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
17
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
18
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
19
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
20
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता

'रुद्र आणि भैरव'; भारतीय सैन्यातील नव्या ब्रिगेडची लष्करप्रमुखांकडून घोषणा, पाकिस्तानला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:37 IST

भारतीय सैन्याने दोन इन्फन्ट्री ब्रिगेडचे रुद्र ब्रिगेडमध्ये रूपांतर केले आहे. तसेच एक नवीन भैरव लाईट कमांडो बटालियन देखील तयार करण्यात आली आहे.

General Upendra Dwivedi on Rudra Brigade: लडाखमधील द्रास येथे २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संबोधित करताना भारतीय सैन्याच्या भविष्यातील आराखडा सांगितला आहे. भविष्यात भारताची रुद्र ब्रिगेड शत्रूंसाठी धोकादायक ठरणार असल्याचे  जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं. येत्या काळात भारतीय सैन्य अधिक शक्तिशाली होईल, असेही लष्करप्रमुख म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना भारताने दहशतवाद्यांचा पराभव केला असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

"ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे पाकिस्तानला थेट संदेश होता की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर होते, ज्याने संपूर्ण देशाला दुखावलं होतं. यावेळी भारताने या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि योग्य उत्तरही दिले. शत्रूला प्रत्युत्तर देणे आता न्यू नॉर्मल झाले आहे," असं जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं.

"सैन्यात रुद्र ब्रिगेडची स्थापना केली जात आहे. मी कालच त्याला मंजुरी दिली. याअंतर्गत, आपल्याकडे एकाच ठिकाणी इन्फन्ट्री, मेकॅनिकल इन्फन्ट्री, आर्मर्ड युनिट्स, तोफखाना, विशेष दल आणि मानवरहित एरियल युनिट्स असतील जे रसद पुरवतील. लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणाली स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होत असल्याने येत्या काळात सैन्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल," असं जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

"सैन्याने 'भैरव लाईट कमांडो' ही विशेष सेना तयार केली आहे. ही तुकडी सीमेवर शत्रूला आश्चर्यचकित करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. प्रत्येक इन्फंट्री बटालियनमध्ये आता एक ड्रोन प्लाटून आहे. तोफखान्यात 'शक्तीबान रेजिमेंट' तयार करण्यात आली आहे, जी ड्रोन, ड्रोनविरोधी उपकरणे आणि आत्मघाती ड्रोनने सुसज्ज असेल. विकसित भारत २०४७ चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. विकास कामात सैन्य देखील योगदान देत आहे. याअंतर्गत लडाखसारख्या सीमावर्ती भागात विकास कामे केली जात आहेत," असेही जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी २६ व्या कारगिल विजय दिनानिमित्त एक पोर्टलसह तीन प्रकल्प सुरू केले. लोक या पोर्टलद्वारे शहीदांना 'ई-श्रद्धांजली' देऊ शकतात.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवान