शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 19:15 IST

"भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता.

संपूर्ण राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराने ढवळून निघाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच, गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी, क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. "भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता. त्यांच्या या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना आज नोटीस बजावली आहे. यानंतर, आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी, "त्यांना (राहुल गांधींना नोटीस) पाठवू द्या, आम्ही उत्तर देऊ. ही फार मोठी गोष्ट नाही," असे म्हटले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गेयासंदर्भात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "त्यांना (राहुल गांधींना नोटीस) पाठवू द्या, आम्ही त्याला उत्तर देऊ. ही फार मोठी गोष्ट नाही. फार गंभीर भाष्य करण्यात आलेले नाही. आम्ही नोटिशीला उत्तर देऊ. आज ते निवडणूक काळात ज्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते योग्य नाही. त्यांना लोकशाही वाचवायची असेल, तर त्यांनी एक समान मैदान द्यायला हवे. मात्र या ऐवजी ईडी, सीबीआय आदींचा वापर केला जात आहे..."

यासंदर्भात, निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तर मागवले आहे. तत्पूर्वी, भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल  कारवाईची मागणी केली होती.

राहुल गांधींनी माफी मागावीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेले अपमानास्पद विधान अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग