शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 06:21 IST

१५ दिवसांत लाखाची भर; एकूण बळी ५ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये मंगळवारी कोरोनाचे जवळपास नऊ हजार नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २ लाख १८ हजारांवर गेली आहे. मुख्य म्हणजे यापैकी १ लाख रुग्ण गेल्या १५ दिवसांतील आहेत.

देशात पहिला रुग्ण केरळमध्ये ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर १८ मे रोजी म्हणजे तब्बल ११० दिवसांनी देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख झाली आणि त्यानंतरच्या १५ दिवसांत आणखी १ लाख रुग्णांची भर पडली. म्हणजेच देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक रुग्ण मरण पावले आहेत.

देशात या आजाराच्या बळींची संख्या ५ हजारांवर गेली आहे. मात्र, या साथीच्या फैलावाने अद्याप कळस गाठलेला नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी भारताने योजलेले उपाय परिणामकारक ठरले आहेत. कोरोनाने अन्य देशांत माजविलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थिती खूपच चांगली आहे. इथे आतापर्यंत जवळपास ५० टक्के रुग्ण बरे झाले आहेत आणि आपल्याकडे मृत्यूदरही खूप कमी आहे.देशामध्ये जून-जुलै या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा फैलाव आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नीती आयोग, एम्स तसेच केंद्र सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये दररोज ८ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत ९५,५२६ जण उपचारांनंतर पूर्णपणे बरे झाले आहेत.

देशात कोरोनामुळे आतापर्यंत बळी गेलेल्यांपैकी ५० टक्के लोक साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते, तर ७० टक्के लोक एकापेक्षा अधिक व्याधींनी ग्रस्त होते. देशात कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाली आहे, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्याबद्दल आयसीएमआरच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा आजार संसर्गजन्य असून, त्याचा किती मोठा फैलाव होतो, यावर लक्ष ठेवावे लागेल. फैलावाबाबत आयसीएमआरने ३४ हजार लोकांशी संपर्क साधून एक पाहणी नुकतीच केली. त्याचे निष्कर्ष या आठवड्याच्या अखेरीस आम्ही जाहीर करू.९४२ विशेष रुग्णालये३० मेपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली, तर देशात कोरोना उपचारांसाठी ९४२ विशेष रुग्णालये असून, तेथील विलगीकरण कक्षात १,५८,९०८ खाटा, तसेच अतिदक्षता विभागात २०,६०८ खाटा, तर आॅक्सिजन देण्याची सोय असलेल्या ६९,३८४ खाटांची सोय करण्यात आली आहे. देशात २,३८० कोरोना प्रतिबंधक केंद्रे असून, त्यातील विलगीकरण कक्षांमध्ये १,३३,६७८ खाटा, तसेच अतिदक्षता विभागांत १०,९१६, तर आॅक्सिजन देण्याची सोय असलेल्या ४५,७५० खाटांची सोय आहे. देशात कोरोना केअर सेंटरमध्ये ६,६४,३३० व क्वारंटाईन सेंटरमध्ये १०,५४१ खाटांची सुविधा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या