शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:37 IST

कटरा ते श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन कटरा ते श्रीनगर, अशी धावेल. महत्वाचे म्हणजे, या ट्रेनच्या माध्यमाने  पहिल्यांदाच काश्मीर खोरे उर्वरित भारताशी जोडले जाईल. वंदे भारत ला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाला भेट दिली आणि तेथे तिरंगा फडकावला. कटरा ते श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त, ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, 'माझे तर डिमोशन झाले आहे. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांत जम्मू आणि काश्मीरसाठी सुरू झालेल्या सर्व रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी मी पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहे, हे माझे भाग्य आहे. पहिला कार्यक्रम अनंतनाग रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचा होते. यानंतर दुसरा कार्यक्रम बनिहाल बोगद्याच्या उद्घाटनाचा होते. मला आठवते की २०१४ मध्ये कटरा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनावेळी मीही उपस्थित होतो. आज स्टेजवर बसलेले सर्व ४ जण त्या दिवशीही तेथे होते. मनोज सिन्हा तेव्हा रेल्वे राज्यमंत्री होते. आता त्यांना जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून बढती देण्यात आली आहे. तर माझे डिमोशन झाले आहे. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे.' अशा प्रकारे त्यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'लवकरच परिस्थिती सामान्य होईल. मला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देतील. याशिवाय, हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आणि यासोबतच जम्मू-काश्मीरच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सक्रिय असल्याने आणि प्रत्येक क्षणी काश्मीरच्या विकासाचे अपडेट्स घेत असल्याने हा विकास शक्य झाला आहे,' असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर