शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:37 IST

कटरा ते श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन कटरा ते श्रीनगर, अशी धावेल. महत्वाचे म्हणजे, या ट्रेनच्या माध्यमाने  पहिल्यांदाच काश्मीर खोरे उर्वरित भारताशी जोडले जाईल. वंदे भारत ला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाला भेट दिली आणि तेथे तिरंगा फडकावला. कटरा ते श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त, ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, 'माझे तर डिमोशन झाले आहे. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांत जम्मू आणि काश्मीरसाठी सुरू झालेल्या सर्व रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी मी पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहे, हे माझे भाग्य आहे. पहिला कार्यक्रम अनंतनाग रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाचा होते. यानंतर दुसरा कार्यक्रम बनिहाल बोगद्याच्या उद्घाटनाचा होते. मला आठवते की २०१४ मध्ये कटरा रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनावेळी मीही उपस्थित होतो. आज स्टेजवर बसलेले सर्व ४ जण त्या दिवशीही तेथे होते. मनोज सिन्हा तेव्हा रेल्वे राज्यमंत्री होते. आता त्यांना जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून बढती देण्यात आली आहे. तर माझे डिमोशन झाले आहे. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे.' अशा प्रकारे त्यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'लवकरच परिस्थिती सामान्य होईल. मला आशा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देतील. याशिवाय, हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आणि यासोबतच जम्मू-काश्मीरच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सक्रिय असल्याने आणि प्रत्येक क्षणी काश्मीरच्या विकासाचे अपडेट्स घेत असल्याने हा विकास शक्य झाला आहे,' असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर