शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"नशीब, पाण्यावर दंडात्मक कारवाई नाही केली!’’, दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 19:29 IST

Old Rajendra Nagar Basement Case: दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर येथे एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरून  दिल्ली हायकोर्टाने आज पोलिसांना चांगलेच फटकारले.

दिल्लीतील ओल्ड राजेंद्रनगर येथे एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासावरून  दिल्ली हायकोर्टाने आज पोलिसांना चांगलेच फटकारले. तसेच आतापर्यंत या प्रकरणाच्या झालेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘’नशीब, पाण्यावर दंडात्मक कारवाई नाही केली!’’ असं विधान यावेळी कोर्टानं केलं.

काळजीवाहू मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर राजेंद्रनगरमधील एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये झालेल्या दुर्घटनेत ३ विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूबाबत उच्चस्तरीच चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी सुनावणीदरम्यान, कोर्टाने तपासाच्या पद्धतीवरून पोलिसांना फैलावर घेत खडेबोल सुनावले. यावेळी न्यायमूर्तींनी दिल्ली पोलिसांच्या वकिलाला सांगितले की, नशीब म्हणजे तुम्ही बेसमेंटमध्ये घुसल्याने पावसाच्या पाण्यावर दंडात्मक कारवाई केलेली नाही. दरम्यान, कोर्टाने या घटनेचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे.

राजेंद्रनगर येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी पावसाच्या पाण्यामधून वेगाने कार चालवून दुर्घटनेस कारण ठरल्याचा ठपका ठेवून एका कारचालकाला अटक केली होती. त्याचा उल्लेख करत कोर्टाने वरील विधान केले. या कारचालकाने वेगाने कार चालवल्याने पाण्याचा दबाव वाढून गेट फुटले आणि बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले, असा आरोप रपोलिसांनी केला होता. दरम्यान, पोलिसांनी ठेवलेला सदोष मनुष्यवधाचा आरोप मागे घेतल्यानंतर ड्रायव्हर मनुज कथुरिया याला गुरुवारी जामीन मिळाला होता.  

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय