शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ओह माय लॉर्ड! भारताच्या माजी सरन्यायाधीशांनी कॉपी पेस्ट केला निकाल? कोर्टाने दिले निकाल रद्द करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:45 IST

Former Chief Justice of India, Deepak Mishra:  भारताच्या एका माजी सरन्यायाधीशांनी एका निकालामधील बहुतांश मजकूर कॉपी पेस्ट केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

अनेकला काही विषयावर लिहिताना, सोशल मीडियावर काही शेअर करताना दुसऱ्याचा मजकूर कॉपी पेस्ट करण्याची सवय अनेकांना असते. मात्र आता चक्क भारताच्या एका माजी सरन्यायाधीशांनी एका निकालामधील बहुतांश मजकूर कॉपी पेस्ट केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. देशाचे माजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यावर हा आरोप झाला आहे. सिंगापूरच्या सुप्रीम कोर्टातील  मुख्य न्यायाधीशांनी आपल्या एका आदेशामधून हा आरोप केला आहे. त्यात ते म्हणाले की, भारताच्या माजी सरन्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रातील ४५१ परिच्छेदांपैकी २१२ परिच्छेद  हे आपल्या एका आदेशामधून कॉपी पेस्ट केलेले आहेत. या बरोबरच सिंगापूरमधील न्यायालयाने दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेला आदेश रद्द केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे माजी सरन्यायाधीशांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. 

माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिलेल्या या निकालपत्रामधील सुमाने ४७ टक्के भाग हा शब्दश कॉपी पेस्ट केलेला आहे, असा दावा करणयात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण स्पेशल पर्पज व्हेईकलशी संबंधित असून, ते भारताच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मॅनेजमेंटसाठी बनवण्यात आले होते. दरम्यान, या मध्यस्थता लवादामध्ये माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश के. के. लाहोटी आणि जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल हे सहभागी होते.

सिंगापूर सर्वोच्च न्यायालयाच्या  मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन यांनी सांगितले की, कॉपी पेस्ट केल्या जाणाऱ्या सामुग्रीने  मध्यस्थता प्रक्रियेतील अखंडतेला बाधित केलं आहे. तसेच ही बाब नैसर्गिक न्यायाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन  करणारी आहे.  दीपक मिश्रा यांनी ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान, भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले होते.

कोर्टाने हेही सांगितले की, आधीच्या अवार्ड्समध्ये केवळ दीपक मिश्रा यांचाचा समावेश होता. या लवादामधील इतर दोन सहमध्यस्थ असलेल्यांना या कॉपी-पेस्टची माहिती नव्हती. एसपीव्हीने केलेल्या दाव्यानुसार मिश्रा यांना समांतर मध्यस्थतेमधून मोठ्या प्रमाणावर मजकुराचा वापर केला. तसेच ते नव्या तर्कांसोबत समायोजित करण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया पक्षपातपूर्ण होती. तसेच पक्षकारांना याची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिंगापूर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय ९ एप्रिल रोजी सुनावण्यात आला. तसेच कायदेशीर वर्तुळामध्ये या निर्णयाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeepak Mishraदीपक मिश्राIndiaभारतsingaporeसिंगापूर