शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बदल्यांवरून अधिकारी, सरकारमध्ये पुन्हा जुंपली;आदेश पाळण्यास अधिकाऱ्यांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 04:45 IST

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे बदलीसंदर्भातील आदेश पाळण्यास सनदी अधिका-यांनी नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे आम्ही कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहोत, प्रसंगी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ , असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर काही तासांतच सरकारने अधिकाºयांच्या बदल्यांसाठी एक नवी पद्धत अमलात आणायचे ठरविले. बदलीचा अंतिम ...

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे बदलीसंदर्भातील आदेश पाळण्यास सनदी अधिका-यांनी नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे आम्ही कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करीत आहोत, प्रसंगी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ , असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर काही तासांतच सरकारने अधिकाºयांच्या बदल्यांसाठी एक नवी पद्धत अमलात आणायचे ठरविले. बदलीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री केजरीवाल घेतील, असे ठरले. मात्र सरकारच्या या आदेशाचे पालन करणार नाही, असे पत्र दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मनिष सिसोदिया यांना लिहिले. अधिकाºयांच्या बदल्या किंवा नियुक्ती करणे याचे अधिकार केंद्रीय गृह खात्याला आहेत अशी २०१६ रोजी जारी केलेली अधिसूचना न्यायालयाने अद्याप रद्दबातल ठरविलेली नसल्याने आम्ही या आदेशाचे पालन करण्यास बांधील नाही, असे मुख्य सचिवांनी पत्रात नमूद केले.सरकारची कृती बेकायदा - जेटलीचौकशीसाठी तपास यंत्रणा किंवा आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही हे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सीएनजी फिटनेसमध्ये झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी सरकारने २०१५ साली स्वतंत्र चौकशी आयोग नेमला होता. मात्र ही चौकशी बेकायदेशीर असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने २०१६ साली दिला होता. जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, सरकारला पोलीस दलविषयक अधिकारच नसल्याने गुन्ह्याच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करणे वगैरे या कृती बेकायदेशीर आहेत.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली