शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 18:02 IST

Farmer Protest News : शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलेआंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केलेअंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले

अंबाला - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून सध्या शेतकरी आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनाही आज हरयाणामधील अंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले.आंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केले. माझे आंबाला येथे सात ते आठ कार्यक्रम आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विरोधच करायचा होता तर कुठेतरी दुसऱ्या जागी जाऊन मरायचे होते. मला काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देवाने सदबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना, असे कटारिया म्हणाले.

कटारिया अंबाला येथे आले असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करायला लावूनच आम्ही थांबणार आहोत, असे शेतकरी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनाही विरोध केला आहे.दरम्यान, शेतकरी आंदोलनाबाबत हरियाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनीही आक्षेपार्ह विधान केले होते. काही परकीय शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आवडत नाही. या परकीय शक्ती शेतकऱ्यांना पुढे करून अडथळे आणत आहेत, धोरणे ही रस्त्यावर नाही तर संसदेत लोकप्रतिनिधी निश्चित कऱतात. शेतकऱ्यांनी विरोध करण्याऐवजी या कायद्यांचा परिणाम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने थांबावे, परिणाम न पाहता विरोध करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी