शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

Odisha Train Accident: 'का अ‍ॅक्टिव्ह नव्हतं कवच सिस्टिम?' रेल्वे अपघाताच्या ठिकाणी CM ममता अन् रेल्वे मंत्री समोरा-समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 18:29 IST

सीएम ममता बॅनर्जी अपघात स्थळाचा आढावा घेण्यासठी बालासोर येथे पोहोचल्या होत्या. यावेळी येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गृहराज्य असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशातील बालासोर येथे जाऊन रेल्वे अपघातस्थळाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित केले. सीएम ममता यांनी माध्यमांशी संवाद साधताना जवळच उभ्या असलेल्या रेल्वेमंत्र्यांना, या मार्गावर कवच सिस्टिम का नव्हते असा प्रश्न विचारला.

सीएम ममता बॅनर्जी अपघात स्थळाचा आढावा घेण्यासठी बालासोर येथे पोहोचल्या होत्या. यावेळी येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गृहराज्य असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते. अश्विनी वैष्णव यांनी ममतांना रिसिव्ह केले आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत पाठविले. 

यानंतर मीडियाला संबोधित करताना दोन्ही नेते एकत्र उभे होते. दरम्यान रेल्वेमंत्री आणि सीएम ममता यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमकही झाली. माध्यमांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, आपण ओडिशा सरकारसोबत समन्वयाने काम करत आहेत. आम्ही एक डॉक्टर आणि एक रुग्णवाहिकाही पाठवली आहे आणि यात अँटी कॉलीजन डिव्हाइस लावण्यात आलेले नव्हते.

'ज्यांनी आपला जीव गमावला...' -ज्यांनी आपला जीव गमावला, ते परत मिळणार नाहीत, त्यामुळे आता बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ममता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधत म्हणाल्या, रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव आहे, कॅमेऱ्यासमोर रेल्वेमंत्री आणि ममता बॅनर्जी यांच्यात मृतांची आकडेवारी आणि बचाव कार्यासंदर्भात टोका-टोकीही झाली.

यावेळी, सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तीन बोगींमध्ये लोक अजूनही अडकलेले आहेत. याच वेळी, रेल्वेमंत्र्यांनी हे चूक असल्याचे सांगत, रेल्वेने बचाव कार्य पूर्ण केले असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवOdishaओदिशाrailwayरेल्वे