शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Train Accident : Video - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसमोर जोडले हात; 51 तासांत ट्रॅक पुन्हा सुरू, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:22 IST

Odisha Train Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पहिली ट्रेन रुळावरून गेल्यावर वैष्णव यांनी हात जोडले.

बालासोर येथे रेल्वेच्या झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान बालासोरमध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी रविवारी रात्री उशिरा रुळ दुरुस्त करून ही लाईन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. तर यापूर्वी ही मेन लाइन सुरू होण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पहिली ट्रेन रुळावरून गेल्यावर वैष्णव यांनी हात जोडले. रेल्वेमंत्री वैष्णव रेल्वे अपघातानंतर अवघ्या 12 तासांनी बालासोरमध्ये घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हापासून ते ओडिशात लोकांच्या सेवेत व्यस्त आहे. येथे त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीपासून ते रूग्णालयापर्यंतच्या जखमींची भेट घेतली असून घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. 

रविवारी रात्री उशिरा ट्रॅक सुरू झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वैष्णव म्हणाले की, आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. हरवलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबियांना शक्य तितक्या लवकर शोधण्यात मदत करणे हे आमचे ध्येय आहे. ट्रॅक सुरू झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी येथून जाणाऱ्या मालगाडीला झेंडा दाखवला आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थनाही केली. पंतप्रधान मोदींच्या आदेशानंतरच ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला होता. दुरुस्ती पथकाने परिश्रमपूर्वक आणि हुशारीने काम केले आणि घटनेनंतर 51 तासांच्या आत अप आणि डाऊन दोन्ही मार्ग पूर्ववत केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

रेल्वेने ओडिशा ट्रेन अपघातात मोटरमनची चूक आणि सिस्टममध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारली आणि 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' सिस्टममध्ये संभाव्य 'तोडफोड' आणि छेडछाड करण्याचे संकेत दिले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अपघाताचे "मूळ कारण" शोधून काढले आहे आणि त्यासाठी जबाबदार "दोषी" शोधले आहेत. 'हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे घडला," 

बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी त्यांनी सांगितले की, छेडछाड होण्याची शक्यता दर्शवत, सिग्नल दिला आणि ट्रेन थांबली" ट्रेन नंबर १२८४१ कोरोमंडल एक्स्प्रेस अप मेन लाईनसाठी रवाना करण्यात आली, पण ट्रेन अप लूप लाईनमध्ये घुसली आणि लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाउन मेन लाइनवरून जात असताना तिचे दोन डबे रुळावरून घसरले आणि उलटले. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातOdishaओदिशाAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे