शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेतील १०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:43 IST

रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.

भुवनेश्वर - ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या भीषण अपघातात २८० बळींपैकी जवळपास १०० जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दु:खात आणखी वाढ झाली आहे. कुटुंब आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या शोधात रुग्णालयाच्या शवागृहात चकरा मारत आहेत. शेकडो छिन्नविछिन्न मृतदेह अजूनही अज्ञात आहेत. शरीराचे काही अवयव आहेत ज्यांवर अनेकांकडून दावा केला जात आहे. मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा हे राज्य सरकार ठरवू शकले नाही? बिहारच्या भागलपूरमधील दोन वेगवेगळ्या कुटुंबांनी एकाच मृतदेहावर दावा केला आहे. मृतदेहाच्या अवस्थेमुळे ओळखणे कठीण झाले आहे.

आता दावेदारांचे डीएनए नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीएनए मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी कुटुंबीयांना बोलावले जाईल. बालासोर तिहेरी ट्रेन दुर्घटनेत बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. पण ओडिशा सरकारसमोर मृतदेहांची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

१७० मृतदेह ताब्यात

ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांनी सांगितले की, बालासोर आणि भुवनेश्वर येथून १७० मृतदेह ताब्यात देण्यात आले आहेत. अनेक जण सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाट पाहत होते परंतु त्यांना अद्याप नातेवाईकांचे मृतदेह सापडले नाहीत. एम्स भुवनेश्वरच्या शवागृहात मृतदेह ठेवण्यात आले आहेत असं ते म्हणाले तर काही मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला अडचणी येत आहेत कारण मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत आणि चेहरे योग्यरित्या ओळखले जात नाहीत असं भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी सांगितले.

'भरपाईसाठी खोटा दावा केला जाऊ शकतो'

पश्चिम बंगालमधील एका वृद्धाने सांगितले की, "आम्ही आमच्या (नातेवाईकांच्या) मृतदेहावर दावा करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाकडे संबंधित कागदपत्रे सादर केली आहेत." मात्र याच मृतदेहावर अन्य कोणीतरी दावा करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मृतदेह सापडला नाही. अधिका-यांनी सांगितले की काही लोक नुकसान भरपाईमुळे खोटे दावे करू शकतात, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.

मृतदेहांसाठी वणवण

बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बासुदेव रॉय यांनी सांगितले की, मी माझ्या भावाच्या आणि दाजीच्या शोधात वेगवेगळ्या रुग्णालयांना भेट देत आहेत. ते कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होते. आम्ही आठ मृतदेह शवागृहात ठेवलेले पाहिले पण त्यात माझा भाऊ आणि बहिणीच्या पतीसारखे नव्हते. बंगालमधील पूरबा मेदिनीपूर येथील गोपाल आणि निमाई मन्ना हे दोन भाऊही दुर्दैवी लोकांपैकी एक होते. ते त्यांचा भाऊ समीर,जो कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये पेंट्री कामगार म्हणून काम करायचा त्याचा शोध घेत आहेत. बालासोरमधील रुग्णालयांना भेट दिल्यानंतर त्यांनी सोमवारी एम्स भुवनेश्वर गाठले. येथे त्यांना त्याचा मृतदेह आढळून आला.

ओडिशाचे विकास आयुक्त अनु गर्ग म्हणाले की, राज्य सरकारने प्रत्येक रुग्णालयात आणि प्रत्येक शवागृहात हेल्प डेस्क सुरू केला आहे. अधिकारी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याची समस्या सहसा अशा मोठ्या अपघाताच्या घटनेत उद्भवते. परंतु, राज्य प्रशासन रेल्वे आणि भारत सरकारच्या अधिकार्‍यांसह एकत्रितपणे समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांना मृतदेहांची छायाचित्रे आणि विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची यादी दाखवत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय पीडितांच्या नातेवाइकांची राहण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात