शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेतील १०० मृतदेहांची ओळख पटेना; एकाच मृतदेहावर अनेक दावेदार, कुटुंबियांची DNA होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:43 IST

रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.

भुवनेश्वर - ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या भीषण अपघातात २८० बळींपैकी जवळपास १०० जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या दु:खात आणखी वाढ झाली आहे. कुटुंब आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या शोधात रुग्णालयाच्या शवागृहात चकरा मारत आहेत. शेकडो छिन्नविछिन्न मृतदेह अजूनही अज्ञात आहेत. शरीराचे काही अवयव आहेत ज्यांवर अनेकांकडून दावा केला जात आहे. मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा हे राज्य सरकार ठरवू शकले नाही? बिहारच्या भागलपूरमधील दोन वेगवेगळ्या कुटुंबांनी एकाच मृतदेहावर दावा केला आहे. मृतदेहाच्या अवस्थेमुळे ओळखणे कठीण झाले आहे.

आता दावेदारांचे डीएनए नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर रुग्णालयात कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीएनए मॅच झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी कुटुंबीयांना बोलावले जाईल. बालासोर तिहेरी ट्रेन दुर्घटनेत बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. पण ओडिशा सरकारसमोर मृतदेहांची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

१७० मृतदेह ताब्यात

ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांनी सांगितले की, बालासोर आणि भुवनेश्वर येथून १७० मृतदेह ताब्यात देण्यात आले आहेत. अनेक जण सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाट पाहत होते परंतु त्यांना अद्याप नातेवाईकांचे मृतदेह सापडले नाहीत. एम्स भुवनेश्वरच्या शवागृहात मृतदेह ठेवण्यात आले आहेत असं ते म्हणाले तर काही मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला अडचणी येत आहेत कारण मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आहेत आणि चेहरे योग्यरित्या ओळखले जात नाहीत असं भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी सांगितले.

'भरपाईसाठी खोटा दावा केला जाऊ शकतो'

पश्चिम बंगालमधील एका वृद्धाने सांगितले की, "आम्ही आमच्या (नातेवाईकांच्या) मृतदेहावर दावा करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाकडे संबंधित कागदपत्रे सादर केली आहेत." मात्र याच मृतदेहावर अन्य कोणीतरी दावा करत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मृतदेह सापडला नाही. अधिका-यांनी सांगितले की काही लोक नुकसान भरपाईमुळे खोटे दावे करू शकतात, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.

मृतदेहांसाठी वणवण

बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बासुदेव रॉय यांनी सांगितले की, मी माझ्या भावाच्या आणि दाजीच्या शोधात वेगवेगळ्या रुग्णालयांना भेट देत आहेत. ते कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होते. आम्ही आठ मृतदेह शवागृहात ठेवलेले पाहिले पण त्यात माझा भाऊ आणि बहिणीच्या पतीसारखे नव्हते. बंगालमधील पूरबा मेदिनीपूर येथील गोपाल आणि निमाई मन्ना हे दोन भाऊही दुर्दैवी लोकांपैकी एक होते. ते त्यांचा भाऊ समीर,जो कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये पेंट्री कामगार म्हणून काम करायचा त्याचा शोध घेत आहेत. बालासोरमधील रुग्णालयांना भेट दिल्यानंतर त्यांनी सोमवारी एम्स भुवनेश्वर गाठले. येथे त्यांना त्याचा मृतदेह आढळून आला.

ओडिशाचे विकास आयुक्त अनु गर्ग म्हणाले की, राज्य सरकारने प्रत्येक रुग्णालयात आणि प्रत्येक शवागृहात हेल्प डेस्क सुरू केला आहे. अधिकारी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याची समस्या सहसा अशा मोठ्या अपघाताच्या घटनेत उद्भवते. परंतु, राज्य प्रशासन रेल्वे आणि भारत सरकारच्या अधिकार्‍यांसह एकत्रितपणे समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांना मृतदेहांची छायाचित्रे आणि विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची यादी दाखवत आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय पीडितांच्या नातेवाइकांची राहण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात