शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशामध्ये जवानांनी 5 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 10:58 IST

ओडिशातील मलकानगिरीतील कालीमेडा येथे सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

भुवनेश्वर - ओडिशामध्ये नक्षलवाद्यांविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहीमेत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेडा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान, पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन जवानांनी 5 हत्यारं आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे. दरम्यान, परिसरात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता रणदेबचाही खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे.

दंतेवाडामध्येही झाली होती चकमक गेल्या आठवड्यात दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. दंतेवाडातील अरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी  बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. 

(म्हणे आम्हाला त्या हत्येचं दु:ख; नक्षलवाद्यांनी जारी केलं पत्र)

 

दूरदर्शनच्या कॅमेरामनची हत्याछत्तीसगढच्या जंगलात दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी पत्र जारी केले. साहू वा पत्रकारांशी आपले अजिबात वैर नसून, सुरक्षा दलाच्या जवानांसह ते आले, तर ते मारले जाऊ शकतील, असा इशारा नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दिला. नक्षलवाद्यांनी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून, त्यात आमचे पत्रकारांशी काहीच वैर नाही, असे स्पष्ट केले. सुरक्षा दलाच्या जवानांसह कॅमेऱ्यासह आलेले लोक हे पत्रकारांच्या तुकडीचा भाग आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. ते सुरक्षा दलाचाच भाग असल्याचे वाटल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे त्यात म्हटले आहे. अच्युतानंद साहू ज्या ठिकाणी बसले होते, ते पाहून आम्हाला ते पत्रकार आहेत, हे समजले नाही. ते जवानच आहेत, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असे नमूद करतानाच, त्यांच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. तसेच यापुढे पत्रकारांनी वा त्यांच्या तुकडीने सुरक्षा दलाच्या जवानांसह येऊ नये, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. तुम्ही एकटे आलात, तर तुमचे इथे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी म्हटले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीOdishaओदिशा