शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

संसदीय कामकाजात अडथळा आणणे हे मुख्य साधन बनले; उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला खेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:27 IST

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला खेद

नवी दिल्ली : संसदीय कामकाजात बिघाड आणणे हे मुख्य साधन बनले असल्याबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “चुकीचे वर्तन करणारे लोकप्रतिनिधी हे घटनेच्या उदात्त तत्वाला सुरूंग लावत आहेत. 

देशासाठी कायदे बनवणे आणि नव्या धोरणांना आकार देण्यासाठी जी व्यापक चर्चा घडणे अपेक्षित असते ती असे चुकीचे वागणारे लोकप्रतिनिधी होऊ देत नाहीत.”“अशा प्रकारचे अडथळे विधिमंडळांच्या कार्यकारी मंडळींच्या जबाबदारीच्या तत्वाला परिणामशून्य करतात. त्यातून अनियंत्रितपणाच्या वृत्तीला प्रोत्साहन मिळते,” असे नायडू म्हणाले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पहिल्या ‘प्रणव मुखर्जी मेमोरियल लेक्चर’मध्ये एम. व्यंकय्या नायडू ‘कॉन्स्टिट्यूशनॅलिझम : द गॅरंटर ऑफ डेमोक्रसी अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ’ या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम प्रणव मुखर्जी लिगसी फाऊंडेशनने आयोजित केला होता.

नायडू प्रणव मुखर्जी यांचा संदर्भ देऊन म्हणाले की, ते सहमती घडवून आणणारे होते. आज जर ते असते तर त्यांनी नुकत्याच रद्द करण्यात आलेल्या रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशनचे स्वागत केले असते अशी माझी खात्री आहे. भारतीय मालमत्तांच्या अप्रत्यक्ष हस्तांतरावर लादण्यात आलेली सर्व पूर्वलक्षी कर आकारणी संपवून टाकणारे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले आहे. नायडू यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विधिमंडळांचे पावित्र्य पुन्हा कायम राखण्यासाठी ठोस सुरूवात करण्याची तातडीची गरज आहे.

प्रणव मुखर्जी तळमळीने बोलायचे

संसदेसह विधिमंडळांत कामकाजात अडथळे आणण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल प्रणव मुखर्जी यांना तीव्र वेदना झाल्या होत्या, असे नायडू यांनी सांगितले. मुखर्जी विधिमंडळांची प्रतिष्ठा, सभ्यता आणि शिष्टाचार कायम राखला जावा यासाठी तळमळीने बोलायचे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू