शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

संसदीय कामकाजात अडथळा आणणे हे मुख्य साधन बनले; उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला खेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 07:27 IST

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला खेद

नवी दिल्ली : संसदीय कामकाजात बिघाड आणणे हे मुख्य साधन बनले असल्याबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “चुकीचे वर्तन करणारे लोकप्रतिनिधी हे घटनेच्या उदात्त तत्वाला सुरूंग लावत आहेत. 

देशासाठी कायदे बनवणे आणि नव्या धोरणांना आकार देण्यासाठी जी व्यापक चर्चा घडणे अपेक्षित असते ती असे चुकीचे वागणारे लोकप्रतिनिधी होऊ देत नाहीत.”“अशा प्रकारचे अडथळे विधिमंडळांच्या कार्यकारी मंडळींच्या जबाबदारीच्या तत्वाला परिणामशून्य करतात. त्यातून अनियंत्रितपणाच्या वृत्तीला प्रोत्साहन मिळते,” असे नायडू म्हणाले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पहिल्या ‘प्रणव मुखर्जी मेमोरियल लेक्चर’मध्ये एम. व्यंकय्या नायडू ‘कॉन्स्टिट्यूशनॅलिझम : द गॅरंटर ऑफ डेमोक्रसी अँड इन्क्लुसिव्ह ग्रोथ’ या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम प्रणव मुखर्जी लिगसी फाऊंडेशनने आयोजित केला होता.

नायडू प्रणव मुखर्जी यांचा संदर्भ देऊन म्हणाले की, ते सहमती घडवून आणणारे होते. आज जर ते असते तर त्यांनी नुकत्याच रद्द करण्यात आलेल्या रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशनचे स्वागत केले असते अशी माझी खात्री आहे. भारतीय मालमत्तांच्या अप्रत्यक्ष हस्तांतरावर लादण्यात आलेली सर्व पूर्वलक्षी कर आकारणी संपवून टाकणारे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले आहे. नायडू यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विधिमंडळांचे पावित्र्य पुन्हा कायम राखण्यासाठी ठोस सुरूवात करण्याची तातडीची गरज आहे.

प्रणव मुखर्जी तळमळीने बोलायचे

संसदेसह विधिमंडळांत कामकाजात अडथळे आणण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल प्रणव मुखर्जी यांना तीव्र वेदना झाल्या होत्या, असे नायडू यांनी सांगितले. मुखर्जी विधिमंडळांची प्रतिष्ठा, सभ्यता आणि शिष्टाचार कायम राखला जावा यासाठी तळमळीने बोलायचे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू