शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 06:53 IST

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारमधील रिक्त जागा भरण्यासाठी २०१० नंतर दिलेले आरक्षण २०१२ च्या अधिनियमान्वये कोलकाता उच्च न्यायालयाने अवैध ठरविले. त्यानुसार बंगालमधील सुमारे ४२ प्रवर्गांचा ओबीसी दर्जा न्यायालयाकडून रद्दबातल ठरविण्यात आला; परंतु या अधिनियमानुसार नोकरी मिळालेल्या लाभार्थ्यांवर परिणाम होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने म्हटले की, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अधिनियम १९९३ अंतर्गत राष्ट्रीय आयोगाचे आदेश व सल्ला हा राज्य विधिमंडळाला पाळावा लागतो. त्यांच्या आदेशाविना व मान्यतेविना राज्य सरकारला ओबीसींच्या राज्य सूचीमध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करणे वा एखाद्या प्रवर्गाचे ओबीसी आरक्षण काढता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पश्चिम बंगाल मागासवर्गीय (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना वगळून) कायदा २०१२ अंतर्गत ओबीसींचा लाभ मिळालेल्या अनेक प्रवर्गांचे आरक्षण काढण्यात आले. 

६६ प्रवर्गांचे आरक्षण कायम२०१० पूर्वी राज्य सरकारने ६६ प्रवर्गांना दिलेला ओबीसी दर्जा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला नाही. कारण त्याविरोधात कोणताही आव्हान याचिका दाखल झाली नव्हती. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

रोजगाराची सर्वांना समान संधी मिळावीन्यायमूर्ती मंथा यांनी दिलेल्या निकालाला सहमती दर्शवित न्या. चक्रवर्ती म्हणाले, सार्वजनिक नोकऱ्यांच्या संधी सर्वांना समान मिळावी, मग तो व्यक्ती खुल्या प्रवर्गातील असो वा आरक्षित प्रवर्गातील. आरक्षणाचा लाभ देताना नियमांचे राज्य सरकारकडून वा अधिकाऱ्यांकडून भंग होऊ नये. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणHigh Courtउच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगाल