शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'हिंदू-मुस्लिम वाद पेटवणाऱ्या नेत्यांना जाळून टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:24 IST

सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ.पी.राजभर यांनी हिंदू-मुस्लिमसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजभर यांनी राजकीय नेत्यांवर दंगली भडकावण्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देनेत्यांवर जातीय दंगली भडकावण्याचा आरोपदंगलींमध्ये नेते का मरत नाहीत - ओ.पी.राजभर

लखनौ - सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ.पी.राजभर यांनी हिंदू-मुस्लिमसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजभर यांनी राजकीय नेत्यांवर दंगली भडकावण्याचा आरोप केला आहे. शिवाय,''आजपर्यंत जातीय दंगलींमध्ये केवळ सामान्य जनतेचाच का बळी जातो?, राजकीय नेते का मरत नाही?'' असा प्रश्नही राजभर यांनी उपस्थित केला आहे. अलीगडमधील एका सभेत संबोधित करताना ओ.पी.राजभर यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ओपी राजभर म्हणाले की, 'हिंदू-मुस्लिमांच्या घडलेल्या दंगलींमध्ये आजपर्यंत एकतरी मोठा नेता मारला गेला आहे का?, नेते का मरत नाहीत? जे नेते हिंदू-मुसलमानांच्या नावावर तुमच्यामध्ये भांडणं लावतात, दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात, अशा नेत्यांनाही जाळून टाका. जेणेकरुन नेत्यांच्या सांगण्यावरुन आपण इतरांना जाळणार नाही, हे त्यांना चांगलंच समजेल. 

पुढे ते असंही म्हणाले की, हे नेते हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडतात. दोन समाजांमध्ये फूट पाडणाऱ्यांनी जरा भारताच्या संविधानाचाही विचार करावा. कारण राज्यघटनेने भारताचा नागरिक असणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे नेतेमंडळींना कोणालाही देशाबाहेर काढता येऊ शकत नाही’.

राजभर यांचा सुहेलदेव बहुजन समाज पक्ष हा उत्तर प्रदेश सरकारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष आहे.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाला एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती.

लोकसभा निवडणूक एकत्रित लढवायची आहे की नाही याचा विचार करण्यासाठी राजभर यांनी भाजपाला 100 दिवसांचा कालावधी दिला आहे. भाजपाकडून वेळेत उत्तर आले नाही तर आमचा पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढवेल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

 

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमyogi adityanathयोगी आदित्यनाथ