शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! 'थ्री इडियट्स' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरांशी फोनवर बोलत डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:20 IST

ओडिसामधील केंद्रपाडा येथील साई हॉस्पिटलमध्ये 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनप्रमाणे डॉक्टरांशी फोनवर बोलत महिलेची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुर्खपणामुळे बाळाचा मात्र जन्माआधीच दुर्देवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देओडिसामधील केंद्रपाडा येथील साई हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी फोनवर बोलत महिलेची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्नबाळाचा मात्र जन्माआधीच दुर्देवी मृत्यूपोलिसांनी डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे

भुवनेश्वर - ओडिसामधील केंद्रपाडा येथील साई हॉस्पिटलमध्ये 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एका सीनप्रमाणे डॉक्टरांशी फोनवर बोलत महिलेची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुर्खपणामुळे बाळाचा मात्र जन्माआधीच दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली. 

आरती समल यांना प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर त्यांचे पती कल्पतरु समल यांनी त्यांना साई हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे गेल्यावर वरिष्ठ डॉक्टर रश्मीकांत पात्रा रुग्णलायत उपस्थित नसल्याचं त्यांना कळलं. कल्पतरु यांनी रश्मीकांत पात्रा यांना फोनवरुन संपर्क साधला. यावेळी रश्मीकांत पात्रा यांनी नर्स डिलिव्हरी करतील असं सांगत कल्पतरु यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नाजूक असल्याने तसंच त्यावेळी लगेच दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कल्पतरु समलदेखील नर्सकडून डिलिव्हरी करुन घेण्यास तयार झाले. 

रुग्णालयाच्या नर्स टीमने डॉ रश्मीकांत यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधत आरती यांच्यावरील ऑपरेशनला सुरुवात केली. पण याचा परिणाम असा झाला की, बाळाचा जन्माआधीच मृत्यू झाला. इतकंच नाही तर आरती यांच्या गर्भाशयालाही इजा झाली. डॉक्टर आणि नर्सेसच्या निष्काळजीपणामुळे फक्त बाळाचा मृत्यू झाला नाही, तर आरती यांच्या गर्भाशयलाही हानी पोहोचली आहे. 

यानंतर कल्पतरुन आपल्या नवजात बाळाचा मृतदेह घेऊन केंद्रपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. कल्पतरु यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कल्पतरु यांनी सांगितलं आहे की, 'जेव्हा आम्ही डॉक्टर रश्मिकांत पात्रा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आरती यांना रुग्णालयात दाखल करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं की, मी रुग्णालयात उपस्थित नाहीये, पण नर्सेससोबत को-ऑर्डिनेट करेन'. डॉक्टर रश्मिकांत पात्रा यांनी विश्वास ठेवायला सांगितल्याने पत्नीला रुग्णालयात भर्ती केलं होतं असं कल्पतरु बोलले आहेत. 

सध्या पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.