शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सुप्रीम काेर्ट ओलांडत आहे ‘लक्ष्मण रेषा’; माजी न्यायाधीशांची पत्राद्वारे टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 05:48 IST

उच्च न्यायालयातील १५ माजी न्यायाधीश, अखिल भारतीय सेवेतील ७७ माजी अधिकारी यांनी असा आरोप केला की, ही टिप्पणी दुर्दैवी आहे.

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपमधून निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवर माजी न्यायाधीश आणि अधिकारी वर्ग यांनी टीका केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात लक्ष्मण रेषेचे उल्लंघन केले आहे. ही टिप्पणी म्हणजे सर्वात मोठ्या लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेवरील हा अमिट डाग असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने ही टिप्पणी मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उच्च न्यायालयातील १५ माजी न्यायाधीश, अखिल भारतीय सेवेतील ७७ माजी अधिकारी यांनी असा आरोप केला की, ही टिप्पणी दुर्दैवी आहे. ती न्यायिक मूल्यांशी सुसंगत नाही. यामुळे देशातील आणि विदेशातील लोकांना धक्का बसला आहे. या समूहाने एका निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात म्हटले की, न्यायपालिकेच्या इतिहासात अशी दुर्दैवी टिप्पणी पाहिली नाही. याप्रकरणी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. कारण, लोकशाही मूल्ये व देशाच्या सुरक्षेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

निवेदनात काय?ही टिप्पणी न्यायिक आदेशाचा भाग नाही. जबाबदार नागरिक म्हणून आम्ही असे मानतो की, लोकशाही तोपर्यंतच अबाधित राहू शकते जोवर सर्व संस्था संविधानानुसार आपापले कर्तव्य पार पाडत राहतील. 

स्वाक्षरी करणाऱ्यात नेमके कोण?या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश क्षितिज व्यास, केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. एन. रवींद्रन, गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. एम. सोनी, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. एन. ढिंगरा यांचा समावेश आहे. माजी आयएएस अधिकारी आनंद बोस, आर. एस. गोपालन आणि एस. कृष्ण कुमार, राजदूत (निवृत्त) निरंजन देसाई, माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद आणि बी. एल, व्होरा, ले. जनरल (निवृत्त) व्ही. के. चतुर्वेदी आणि एअर मार्शल (निवृत्त) एस. पी. सिंह यांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?न्यायालयाने नुपूर शर्मा यांना वक्तव्याप्रकरणी फटकारले होते. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याने पूर्ण देशाला आगीत लोटले आहे व देशात जे काही होत आहे त्यासाठी त्या एकट्या जबाबदार आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय