शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ओडिशात चक्रीवादळातील बळींची संख्या १६, युद्धस्तरावर मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 06:11 IST

चक्रीवादळ फोनीमुळे ओडिशात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याचा फटका बसला आहे.

भुवनेश्वर - चक्रीवादळ फोनीमुळे ओडिशात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. या वादळाने धडक दिल्याच्या एक दिवसानंतर राज्यात जवळपास १० हजार गावांत आणि शहरी भागात युद्धस्तरावर मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. ४३ वर्षांत झालेल्या तीन मोठ्या वादळांपैकी हे एक आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०० किमी प्रति तास वेगाने आलेल्या वादळामुळे शुक्रवारी पुरीमध्ये जोरदार पाऊस आणि वादळाने हाहाकार माजवला. हे वादळ शांत होईपर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या वादळाच्या तडाख्यात आलेल्या गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली आणि अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.या वादळाने शुक्रवारपर्यंत ८ बळी घेतले होते. मयूरभंज जिल्ह्यासह अन्य भागांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढून १६ झाली. अनेक भागांतील सविस्तर माहिती येणे अद्याप बाकी आहे. मयूरभंज जिल्ह्याचे आपत्कालीन विभागाचे अधिकारी एस. के. पती यांनी सांगितले की, बारीपदामध्ये वेगवेगळ्या जागी झाडे उन्मळून चार जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली. मोदी यांनी राज्य सरकारला आश्वासन दिले की, केंद्राकडून राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल.मोदी उद्या ओडिशात भेट देणारपंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ओडिशाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यपाल गणेशलालजी यांच्याशी मोदी यांनी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशा