शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 06:53 IST

गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.

जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.  ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. संसदेला सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाण २०१४ नंतर कमालीचे वाढले आहे. सन २०११ ते २०१३ या काळात भरतीचे प्रमाण कमी होताना दिसले होते. सन २०११ मध्ये २३ तरुण दहतवादी संघटनांत सहभागी झाले, तर हाच आकडा २०१२ मध्ये २१ आणि २०१३ मध्ये १६ इतका होता. मात्र, २०१४ मध्ये हा आकडा ५३ वर पोहोचला. पुढच्या तीन वर्षात हे आकडे अनुक्रमे ६६, ८८ व १२६ असे वाढत गेले. हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या बुºहान वणी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर तरुणांचे हत्यार हातात घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नव्वदच्या दशकात दहशतवादाकडे ओढले जाणारे तरुण वआताचे यात आमुलाग्र फरक आहे, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. सध्या दहशतवादी संघटनांत भरती होणारे तरुण आधीच्या तुलनेत कमालीचे कट्टर आहेत. त्यांना कारवायांमध्ये मारले जाण्याची अजिबात फिकीर नसते. तुरुंगात २,६९४ कैदीमुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी असेही सांगितले की, राज्यात विविध तुरुंगांमध्ये २ हजार ६९४ लोक कैदेत आहेत. यात ९६ महिला आहेत. यातील आठ महिलांसह २८८ जणांवर दोष सिद्ध झाला आहे. अन्य २ हजार १५६ जणांवर खटले सुरु आहेत. >दगडफेकीत ११,५६६ जवान जखमी तीन वर्षांत काश्मीरमध्ये दगडफेकीत ११ हजार ५६६ सुरक्षा जवान जखमी झाले असून, ११० स्थानिक रहिवासी व दोन पोलिसांना जीव गमावले आहेत, अशीही माहिती मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. या तीन वर्षांमध्ये दगडफेकीच्या ४७३६ घटना घडल्या. त्यात ९ हजार ६७० पोलीस कर्मचारी आणि १ हजार ८९६ सुरक्षा जवान जखमी झाले. ५१५ घुसखोरांना अटकनवी दिल्ली : लोकसभेत गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जम्मू-काश्मिरात ५१५ घुसखोरांना अटक करण्यात आली आणि ७५ अतिरेकी कारवाईत ठार झाले. सन २०१६ मध्ये सीमेवर घुसखोरी करणाºया ४५ अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आले.  सीमेवरुन होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे, घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद