शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 07:05 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; ६० हजार खटले प्रलंबित

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालायातील न्यायाधीशांची संख्या तीसवरून ३३ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्याधीशांशिवाय सर्वोच्च न्यायालयात सध्या न्यायाधीशांची स्वीकृत संख्या ३० आहे. सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची संख्या ६० हजारांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंबंधीच्या विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर न्यायाधीशांंची संख्या (सरन्यायाधीश वगळून) ३३ होईल, तर सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ होईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. अलीकडेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. राज्यसभेत ११ जुलै रोजी कायदा मंत्रालयाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार सर्वोच्च न्यायालयात ५९ हजार ३३१ खटले प्रलंबित आहेत. न्यायाधीशांची वाणवा असल्याने कायदेशीर मुद्यासह महत्त्वाचे खटले निकाली काढण्यासाठी आवश्यक संख्येने न्यायापीठ स्थापन करता येत नाहीत, असे सरन्यायाधीशांनी म्हटले होते.

आयोगाला मुदतवाढकेंद्रीय यादीत इतर मागासवर्गीय प्रवर्गात उपवर्ग तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला मुदतवाढ देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आयोगाचा कार्यकाळ ३१ जुलै २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.काश्मीरमध्ये १० टक्के आरक्षण जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नोकरी आणि शैक्षणिक संस्थेत १० टक्के राखीव जागा ठेवण्यासंबंधीच्या विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे.खतावरील सबसिडीत वाढकेंद्र सरकारने युरियारहित खतांवरील सबसिडीत वाढ केली असून त्यामुळे चालू वित्तीय वर्षात सरकारच्या तिजोरीवर २२,८७५.५० कोटी रुपयांचा बोझा पडेल. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश खतांसाठी सरकारने २०१९-२० या वर्षासाठी पोषकघटक आधारित दरांना मंजुरी दिली आहे. यामुळे खतांचा संतुलीत वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय