शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:39 IST

भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसादपर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ बांगलादेशचे पर्यटक जास्त

नवी दिल्ली, दि. 17 -  भारतात येणा-या  विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याती माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटन मंत्रिमंडळाकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये यावर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यात भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ झाली आहे, असे म्हटले आहे. विदेशी देशांपैकी भारतात येणारा पर्यटकांमध्ये बांगलादेशचे पर्यटक जास्त आहेत. त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. गेल्या जुलै महिन्यात बांगलादेशातून 20.12 टक्के, अमेरिकेतून 16.26 टक्के, ब्रिटनमधून 10.88 टक्के आणि फ्रान्समधून 3.01 टक्के पर्यटक भारतात आले आहेत.  जानेवारी ते जुलै 2017 मध्ये 56.74 लाख पर्यटक भारतात आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 49.30 लाख पर्यटक आल्याची नोंद पर्यटन मंत्रालयाकडे आहे. याचबरोबर, गेल्या जुलै महिन्यात 7.88 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर गेल्यावर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 7.4 टके वाढ झाली आहे.   विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-व्हिसा या सेवेमुळे सुद्धा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ई-व्हिसावरुन 1.19 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर, याच महिन्यात गेल्यावर्षी 2016 मध्ये 0.68 लाख विदेशी पर्यटक आले होते. त्यामध्ये यंदा यामध्ये जवळपास 73.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.  ई-व्हिसा सेवेचा लाभ घेत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांपैकी अमेरिकेचे पर्यटक जास्त आहेत. यामध्ये अमेरिका (12 टक्के) यूएई (7.2 टक्के), फ्रान्स (6.4 टक्के) ओमन (6.1 टक्के) आणि चीन (5.4 टक्के) या देशांमधील पर्यटक गेल्या जुलै महिन्यात ई-व्हिसावरुन भारतात आहे.