शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:39 IST

भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसादपर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ बांगलादेशचे पर्यटक जास्त

नवी दिल्ली, दि. 17 -  भारतात येणा-या  विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याती माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटन मंत्रिमंडळाकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये यावर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यात भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ झाली आहे, असे म्हटले आहे. विदेशी देशांपैकी भारतात येणारा पर्यटकांमध्ये बांगलादेशचे पर्यटक जास्त आहेत. त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. गेल्या जुलै महिन्यात बांगलादेशातून 20.12 टक्के, अमेरिकेतून 16.26 टक्के, ब्रिटनमधून 10.88 टक्के आणि फ्रान्समधून 3.01 टक्के पर्यटक भारतात आले आहेत.  जानेवारी ते जुलै 2017 मध्ये 56.74 लाख पर्यटक भारतात आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 49.30 लाख पर्यटक आल्याची नोंद पर्यटन मंत्रालयाकडे आहे. याचबरोबर, गेल्या जुलै महिन्यात 7.88 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर गेल्यावर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 7.4 टके वाढ झाली आहे.   विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-व्हिसा या सेवेमुळे सुद्धा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ई-व्हिसावरुन 1.19 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर, याच महिन्यात गेल्यावर्षी 2016 मध्ये 0.68 लाख विदेशी पर्यटक आले होते. त्यामध्ये यंदा यामध्ये जवळपास 73.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.  ई-व्हिसा सेवेचा लाभ घेत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांपैकी अमेरिकेचे पर्यटक जास्त आहेत. यामध्ये अमेरिका (12 टक्के) यूएई (7.2 टक्के), फ्रान्स (6.4 टक्के) ओमन (6.1 टक्के) आणि चीन (5.4 टक्के) या देशांमधील पर्यटक गेल्या जुलै महिन्यात ई-व्हिसावरुन भारतात आहे.