शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

कर्जमाफीच्या अपेक्षेने देशभरात वाढतेय थकबाकीदार शेतक-यांची संख्या

By admin | Updated: June 13, 2017 09:12 IST

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता इतर राज्यातही शेतक-यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता इतर राज्यातही शेतक-यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे. कर्जमाफीच्या अपेक्षेने विविध राज्यातील शेतक-यांचा कर्जाची परतफेड बंद करण्याकडे कल वाढू लागला आहे. यामुळे आधीच बुडीत कॉर्पोरेट कर्जाच्या फे-यात अडकलेल्या सरकारी बँकांवरील दबाव वाढू लागला आहे. शेतकरी देणी चुकवायला चालढकल करत असल्याचे प्रकार देशभरात वाढू लागल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. 
 
सोमवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली. एकूण शेतीसाठी घेतलेले कर्ज 10 लाख कोटीच्या घरात आहे. मागच्या काही महिन्यात काही राज्यांमध्ये कर्ज थकबाकीदारांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे बँकिग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. शेतकरी त्यांच्या बँक खात्यातून पैसा काढून घेत असल्याने आम्हाला कर्जाचा हप्ता कापता येत नाही असे एका बँक अधिका-याने सांगितले. 
 
दक्षिणेत मुख्यालय असलेल्या एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या प्रमुखाने सांगितले की, काही ठिकाणी कर्ज थकबाकीदार एकत्र येऊन दिलासा देण्याची मागणी करत आहेत. आंधप्रदेश, तेलंगण, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. आता ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथल्या राज्यकर्त्यांवर कर्जमाफीची घोषणा करण्याचा दबाव वाढू लागला आहे. 
 
आणखी वाचा 
 
आंध्रप्रदेशात थकीत देणी वसूल करताना अडचणींचा सामना करावा लागतोय असे दोन बँकांच्या चेअरमननी सांगितले. आंधप्रदेशात चंद्राबाबू नायडूंचे सरकार असून त्यांनी शेतक-यांना 40 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीमुळे दिलासा मिळत असला तरी, दीर्घकालीन बँकिंग व्यवहारांवर त्याचा परिणाम होतो असे बँकिंग क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. शेतक-यांना मदत आवश्कयक आहे पण त्यासाठी आर्थिक शिस्त बिघडवू नका असा इशारा मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी दिला होता. 
 
शेतकरी कर्जमाफीला जमीनमर्यादा नाही
सरसकट कर्जमाफीसाठी कमाल जमीनधारणेची कोणतीही अट असणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्रासह इतर जी राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील, त्याची तजवीज त्यांनी आपल्या तिजोरीतूनकरावी, अशी स्पष्ट ताकीद केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.