शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

कर्जमाफीच्या अपेक्षेने देशभरात वाढतेय थकबाकीदार शेतक-यांची संख्या

By admin | Updated: June 13, 2017 09:12 IST

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता इतर राज्यातही शेतक-यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता इतर राज्यातही शेतक-यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे. कर्जमाफीच्या अपेक्षेने विविध राज्यातील शेतक-यांचा कर्जाची परतफेड बंद करण्याकडे कल वाढू लागला आहे. यामुळे आधीच बुडीत कॉर्पोरेट कर्जाच्या फे-यात अडकलेल्या सरकारी बँकांवरील दबाव वाढू लागला आहे. शेतकरी देणी चुकवायला चालढकल करत असल्याचे प्रकार देशभरात वाढू लागल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. 
 
सोमवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली. एकूण शेतीसाठी घेतलेले कर्ज 10 लाख कोटीच्या घरात आहे. मागच्या काही महिन्यात काही राज्यांमध्ये कर्ज थकबाकीदारांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे बँकिग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. शेतकरी त्यांच्या बँक खात्यातून पैसा काढून घेत असल्याने आम्हाला कर्जाचा हप्ता कापता येत नाही असे एका बँक अधिका-याने सांगितले. 
 
दक्षिणेत मुख्यालय असलेल्या एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या प्रमुखाने सांगितले की, काही ठिकाणी कर्ज थकबाकीदार एकत्र येऊन दिलासा देण्याची मागणी करत आहेत. आंधप्रदेश, तेलंगण, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. आता ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथल्या राज्यकर्त्यांवर कर्जमाफीची घोषणा करण्याचा दबाव वाढू लागला आहे. 
 
आणखी वाचा 
 
आंध्रप्रदेशात थकीत देणी वसूल करताना अडचणींचा सामना करावा लागतोय असे दोन बँकांच्या चेअरमननी सांगितले. आंधप्रदेशात चंद्राबाबू नायडूंचे सरकार असून त्यांनी शेतक-यांना 40 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीमुळे दिलासा मिळत असला तरी, दीर्घकालीन बँकिंग व्यवहारांवर त्याचा परिणाम होतो असे बँकिंग क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. शेतक-यांना मदत आवश्कयक आहे पण त्यासाठी आर्थिक शिस्त बिघडवू नका असा इशारा मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी दिला होता. 
 
शेतकरी कर्जमाफीला जमीनमर्यादा नाही
सरसकट कर्जमाफीसाठी कमाल जमीनधारणेची कोणतीही अट असणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्रासह इतर जी राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील, त्याची तजवीज त्यांनी आपल्या तिजोरीतूनकरावी, अशी स्पष्ट ताकीद केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.