शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अपेक्षेने देशभरात वाढतेय थकबाकीदार शेतक-यांची संख्या

By admin | Updated: June 13, 2017 09:12 IST

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता इतर राज्यातही शेतक-यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 13 - उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता इतर राज्यातही शेतक-यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे. कर्जमाफीच्या अपेक्षेने विविध राज्यातील शेतक-यांचा कर्जाची परतफेड बंद करण्याकडे कल वाढू लागला आहे. यामुळे आधीच बुडीत कॉर्पोरेट कर्जाच्या फे-यात अडकलेल्या सरकारी बँकांवरील दबाव वाढू लागला आहे. शेतकरी देणी चुकवायला चालढकल करत असल्याचे प्रकार देशभरात वाढू लागल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. 
 
सोमवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली. एकूण शेतीसाठी घेतलेले कर्ज 10 लाख कोटीच्या घरात आहे. मागच्या काही महिन्यात काही राज्यांमध्ये कर्ज थकबाकीदारांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे बँकिग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले. शेतकरी त्यांच्या बँक खात्यातून पैसा काढून घेत असल्याने आम्हाला कर्जाचा हप्ता कापता येत नाही असे एका बँक अधिका-याने सांगितले. 
 
दक्षिणेत मुख्यालय असलेल्या एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या प्रमुखाने सांगितले की, काही ठिकाणी कर्ज थकबाकीदार एकत्र येऊन दिलासा देण्याची मागणी करत आहेत. आंधप्रदेश, तेलंगण, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली आहे. आता ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत तिथल्या राज्यकर्त्यांवर कर्जमाफीची घोषणा करण्याचा दबाव वाढू लागला आहे. 
 
आणखी वाचा 
 
आंध्रप्रदेशात थकीत देणी वसूल करताना अडचणींचा सामना करावा लागतोय असे दोन बँकांच्या चेअरमननी सांगितले. आंधप्रदेशात चंद्राबाबू नायडूंचे सरकार असून त्यांनी शेतक-यांना 40 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफीमुळे दिलासा मिळत असला तरी, दीर्घकालीन बँकिंग व्यवहारांवर त्याचा परिणाम होतो असे बँकिंग क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. शेतक-यांना मदत आवश्कयक आहे पण त्यासाठी आर्थिक शिस्त बिघडवू नका असा इशारा मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी दिला होता. 
 
शेतकरी कर्जमाफीला जमीनमर्यादा नाही
सरसकट कर्जमाफीसाठी कमाल जमीनधारणेची कोणतीही अट असणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तर महाराष्ट्रासह इतर जी राज्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील, त्याची तजवीज त्यांनी आपल्या तिजोरीतूनकरावी, अशी स्पष्ट ताकीद केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.