शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

केंद्रात पुन्हा माेदी सरकार येताच एनआरसी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:17 IST

एनआरसीद्वारे देशातील नागरिकांची, तसेच अवैधपणे देशात वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटविली जाणार आहे.

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रात पुन्हा सत्तेवर येताच भाजप सरकार भारतीयांची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागू करणार आहे. त्याचबरोबर २०२१ मध्ये रद्द करण्यात आलेली जनगणना नव्याने करण्याची घोषणाही नवे सरकार जुलैमध्ये करू शकते. केंद्रीय गृह मंत्रालयातील वेगवान हालचाली पाहता मोठे निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

एनआरसीद्वारे देशातील नागरिकांची, तसेच अवैधपणे देशात वास्तव्याला असलेल्या परदेशी नागरिकांची ओळख पटविली जाणार आहे. सीमावर्ती राज्यांत आतापासूनच एनआरसीला जोरदार विरोध सुरू झाला आहे. आसामातही हा प्रमुख निवडणूक मुद्दा बनला आहे. बंगाल व आसाममध्ये बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशींसाठी एनआरसी हे मोठे पाऊल असेल. सरकार कोणतेही येवो. मात्र, जनगणनेचा निर्णय जुलैमध्येच घ्यावा लागेल, असे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

एनपीआर कशासाठी? सरकार स्थापनेनंतर जनगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या सूची अर्थात, एनपीआर अद्ययावत करण्याचा निर्णयही घेतला जाईल. एनपीआरमुळे केंद्र सरकारला देशाची लोकसंख्या, त्यांचे उत्पन्न, रोजगार, आरोग्य आदी सर्व प्रकारची आकडेवारी तयार मिळेल. त्याआधारे सरकारला योजना तयार करता येतील. 

दंगली घडवतील, सावध राहा : ममता निवडणुकीदरम्यान काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील. लोकांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए, एनआरसी लागू होऊ देणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी