शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:53 IST

शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली

नवी दिल्ली : शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली असून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे सरकारतर्फे राबविले जाणारे दोन्ही प्रस्तावित कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला त्रासात टाकणारे ‘अनावश्यक व वायफळ उद्योग’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.देशातील नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात या निवृत्त अधिकाऱ्यांनी हे मतप्रदर्शन केले असून ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ची तरतूद असलेली १९५५ च्या नागरिकत्व कायद्यातील संदर्भित कलमे रद्द करण्याचा जनतेने सरकारकडे आग्रह धरावा असे आवाहन केले आहे.हे पत्र लिहिणाºयांमध्ये दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, निवृत्त कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्ला इत्यादींचा समावेश आहे. हे अधिकारी पत्रात लिहितात की, अर्थव्यवस्तेची सध्याची स्थिती पाहता सरकारने त्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असताना सरकार व जनता परस्परांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र देशाला परवडणारे नाही. शिवाय ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ लागू न करण्याची भूमिका अनेक राज्य सरकारांनी घेतली असताना केंद्र व राज्यांमधील संघर्ष आपल्या संघराज्य व्यवस्थेला पोषक नाही. नव्याने करण्यात आलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे मागे घेण्याखेरीज नागरिकत्व न्यायाधिकरणे व ‘डिटेन्शन कॅम्प’ स्थापन करण्यासंबंधीचे आदेशही मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक