शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:53 IST

शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली

नवी दिल्ली : शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली असून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे सरकारतर्फे राबविले जाणारे दोन्ही प्रस्तावित कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला त्रासात टाकणारे ‘अनावश्यक व वायफळ उद्योग’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.देशातील नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात या निवृत्त अधिकाऱ्यांनी हे मतप्रदर्शन केले असून ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ची तरतूद असलेली १९५५ च्या नागरिकत्व कायद्यातील संदर्भित कलमे रद्द करण्याचा जनतेने सरकारकडे आग्रह धरावा असे आवाहन केले आहे.हे पत्र लिहिणाºयांमध्ये दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, निवृत्त कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त वजाहत हबिबुल्ला इत्यादींचा समावेश आहे. हे अधिकारी पत्रात लिहितात की, अर्थव्यवस्तेची सध्याची स्थिती पाहता सरकारने त्याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे असताना सरकार व जनता परस्परांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र देशाला परवडणारे नाही. शिवाय ‘एनपीआर’ व ‘एनआरसी’ लागू न करण्याची भूमिका अनेक राज्य सरकारांनी घेतली असताना केंद्र व राज्यांमधील संघर्ष आपल्या संघराज्य व्यवस्थेला पोषक नाही. नव्याने करण्यात आलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पूर्णपणे मागे घेण्याखेरीज नागरिकत्व न्यायाधिकरणे व ‘डिटेन्शन कॅम्प’ स्थापन करण्यासंबंधीचे आदेशही मागे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक