शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

"मणिपूर हिंसाचारावर संसदेत बोलू दिलं नाही", भाजपच्या मित्रपक्षाच्या खासदाराचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 18:48 IST

लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष नागा पीपल्स फ्रंटच्या (NPF) खासदाराने मणिपूर हिंसाचाराबद्दल धक्कादायक विधान केले आहे. पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावर बोलायचे होते. मात्र वरिष्ठांनी संसदेत बोलण्याची परवानगी दिली नाही. या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यापासून रोखण्यात आले. आम्ही भाजपचे मित्रपक्ष असलो तरी आपल्या लोकांसाठी बोलण्याचीही जबाबदारी आहे, असे स्पष्ट शब्दांत एनपीएफ खासदार लोरहो पफोज यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोरहो पफोज यांना कोणी बोलू दिले नाही, असे विचारले असता त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. भाजपचा मित्रपक्ष असल्याने हात बांधले आहेत, असे लोरहो पफोज म्हणाले. तसेच, भाजपने राज्यात विकास केला आहे, डोंगराळ भागातही चांगले काम केले आहे. पण राज्यात नुकताच झालेला हिंसाचार हाताळण्यात भाजपची चूक झाली आहे, असेही लोरहो पफोज म्हणाले.

याचबरोबर, लोरहो पीफोज यांनी काँग्रेसने नेते राहुल गांधींचे कौतुक केले. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते असतानाही राहुल गांधी मणिपूरला पोहोचले. त्यांनी हिंसाग्रस्त लोकांसोबत चर्चा केली. जे योग्य होते आणि परिस्थितीची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरकडे लक्ष देत नाहीत ही माझ्यासाठी दुःखाची बाब आहे. पंतप्रधानांनी तिथे जाऊन जनतेच्या जखमेवर मलम लावले पाहिजे, असे लोरहो पफोज यांनी म्हटले आहे.

मणिपूर हिंसाचारावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधक केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारामुळेच अविश्वास प्रस्ताव आणला गेला. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच, मणिपूरमध्ये आग लागली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत हसणे आणि विनोद करणे, हे अशोभनीय आहे, असे राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटले होते. 

टॅग्स :BJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचार