शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

आता आसाममध्ये भाषेवरून वाद, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "ब्लॅकमेलिंग नही चलेगी...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 22:30 IST

एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर...!

महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादानंतर, आता आसाममध्येही भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. आसाममधील जनगणनेदरम्यान एका अल्पसंख्याक विद्यार्थी नेत्याने बंगाली भाषिक मुस्लिमांना आसामीऐवजी बंगाली, हीच आपली मातृभाषा लिहिण्याचे आवाहन केले आहे. यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही इशारा दिला आहे. मुख्यमंत्र हिमंता बिस्वा सरमा यांनी, असमिया भाषा ही आसामची स्थायी राज भाषा असल्याचे म्हणत, कुणीही भाषेचा वापर ब्लॅकमेलिंगचे शस्त्र म्हणून करू नये, असे म्हटले आहे.

एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर... -भाषा वादाच्या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आसमिया ही आसामची स्थायी अधिकृत भाषा आहे. तिला घटनात्मक वैधता आहे. भाषेचा वापर ब्लॅकमेलिंग करण्याचे शस्त्र म्हणून करता येणार नाही. त्यांनी आसमिया त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तरी हे तथ्य बदलणार नाही. तथापि, जर एखाद्या समुदायाने आसमियाला त्यांची मातृभाषा म्हणून सूचीबद्ध केले नाही, तर राज्यात किती बेकायदेशीर परदेशी आहेत हे उघड होईल." 

ऑल बोडोलँड टेरिटोरियल काउंन्सिल मायनॉरिटीच्या विद्यार्थी संघटनेचा नेता मैनुद्दीन अलीने, येत्या जनगणनेत बंगाली मुस्लिमांनी आसमिया ही मातृभाषा म्हणून लिहू नये, असे आवाहन केले होते. यामुळे हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. असे केल्यास आसमिया ही आसाममधील बहुसंख्य लोकांची भाषा राहणार नाही, अशे त्याने म्हटले होते.

विद्यार्थी नेत्याची पक्षातून हकालपट्टी -माध्यमांतील वृत्तांनुसार, विद्यार्थी नेत्याच्या या वादग्रस्त विधानानंतर, ऑल बोडोलँड टेरिटोरियल काउंन्सिल मायनॉरिटीने त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याच बरोबर, संबंधित विद्यार्थी नेत्यानेही त्यांच्या या विधानासंदर्भात माफीही मागितली आहे.

टॅग्स :AssamआसामMuslimमुस्लीम