शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सर्व काही गेले वाहून, आता जवळच्यांचा शोध सुरू; कुल्लूमध्येही धरण फुटल्याने घरे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 06:21 IST

अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड :हिमाचल प्रदेशात ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या ४९ जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू म्हणाले, ‘मदत आणि बचावकार्य जोरात सुरू आहे. काल रात्रीपासून प्रशासकीय अधिकारी बचावकार्यात गुंतले आहेत. आपण स्वतः बाधित भागात जात आहोत. मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी आप्त, स्वकीय गमावले त्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ४९ जण अजूनही बेपत्ता आहेत. मलाना ऊर्जा प्रकल्पाजवळील धरण फुटल्यामुळे कुल्लू येथील घरे आणि मंदिरांनाही फटका बसला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सुखू यांनी दिली. दुसरीकडे, मंडीतील पधार उपविभागातील थलतुखोडमध्ये ढगफुटी झाल्याची माहिती देताना राज्यमंत्री राजेश धर्मानी म्हणाले की, तेथे ४ जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण अद्याप बेपत्ता आहेत.

हिमाचल, उत्तराखंडसाठी आर्थिक मदतीची मागणी 

केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला आर्थिक मदत करावी, जिथे ढगफुटी आणि भूस्खलन, पुरामुळे सुमारे दोन डझन लोकांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत, अशी मागणी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी शुक्रवारी राज्यसभेत शून्य तासात केली.पायात बेड्या बांधलेली महिला वाहत गेली

छत्तीसगडमधील पायात बेड्या घातलेली सरोजनी चौहान ही ३५ वर्षीय मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिला महानदीच्या पुराच्या पाण्यात २० किलोमीटरपर्यंत वाहून गेली. शेजारच्या ओडिशातील मच्छीमारांनी तिची सुटका केली. आश्चर्यजनकरीत्या बचावल्यानंतर सरोजनी चौहानला सारंगढ-बिलाईगड जिल्ह्यातील सारिया भागात तिच्या घरी परत आणण्यात आले आणि त्यानंतर शेजारच्या रायगड जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरोजिनी या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. 

देव तारी त्याला काेण मारी; चाैघे बचावले

वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई परिसरात दरडीच्या ढिगाऱ्याखाली गेले तीन दिवस अडकून पडलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना लष्करी जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून शुक्रवारी बाहेर काढले आहे. दरड कोसळल्यानंतर त्याखाली या कुटुंबाचे घर व त्यातील माणसे दबली गेली होती. 

केदारनाथ मार्गावर यात्रेकरू अडकले

रुद्रप्रयाग : पावसामुळे खराब झालेल्या केदारनाथ यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्यासाठी शुक्रवारी भारतीय हवाई दलाच्या चिनूक आणि मिग-१७ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. सुमारे १५०० यात्रेकरू या मार्गावर अडकले आहेत. अडकलेल्या भाविकांपर्यंत अन्नाची ५००० पाकिटे पोहोचवली आहेत. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करून केदारनाथ यात्रा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. हवाई आणि जमिनीवरील बचाव कार्यांतर्गत केदारनाथ मार्गावरून आतापर्यंत ३००० हून अधिक भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश