शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आता एन्काउंटर सुरू आहे, तुमच्याशी नंतर बोलतो... कर्नल मनप्रीत सिंह यांचा तो कॉल ठरला अखेरचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 07:24 IST

Indian Army: ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले.

श्रीनगर : ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले. बुधवारी अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांच्यासह  आणखी ३ जण शहीद झाले होते. कर्नल मनप्रीत सिंह शहीद झाल्याचे वृत्त त्यांच्या पत्नीलाही देण्यात आले नव्हते, ते केवळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. या सर्व शहिदांच्या घरावर शोककळा पसरली, परंतु ते देशासाठी शहीद झाल्याचे सांगत त्यांनी भावनेपेक्षा कर्तव्यभावना मोठी हे दाखवून दिले.

शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंह हे चंडीगडचे रहिवासी होते आणि मेजर आशिष धौनक हे पानिपतचे रहिवासी होते. शहिदांच्या घरी सांत्वनासाठी नागरिकांची रीघ लागली आहे.

दोन दहशतवाद्यांना घेरले : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरले आहे. काश्मीर पोलिसांनी शहिदांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, आमचे सैन्य दहशतवाद्यांना घेरण्यात निर्धाराने गुंतले आहे.

तो देशासाठी शहीद,  मी रडणार नाहीमी वीरपुत्राला जन्म दिला होता. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. मी त्याला नमन करीन. मी त्याला माझ्या मांडीवर घेईन, मी रडणार नाही. तो आम्हा सातही जणांना रडवत रडवत निघून गेला.    - मनजीत कौर(कर्नल  मनप्रित सिंह यांच्या आई) 

दोन महिन्यांच्या मुलीचे आभाळ हरवले...n दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये पोलिस उपअधीक्षक हुमायून भट यांचाही समावेश आहे. हुमायून भट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. भट यांचे वडील गुलाम हसन भट हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक (आयजी) आहेत. n मुलाचा मृतदेह घरी आणण्यात आल्यानंतर गुलाम हसन भट यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यावेळी ते काही वेळ स्तब्ध उभे राहिले. जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस दलात नोकरी धोक्याची आहे, हे ते स्वत: महानिरीक्षक राहिलेले असल्यामुळे त्यांना चांगलेच माहीत होते.

नवीन घर पाहिलेच नाही...मेजर आशिष हे २ वर्षांच्या मुलीचे वडील होते. त्यांचे कुटुंब सध्या सेक्टर-७ मध्ये भाड्याच्या घरात राहते. त्यांनी टीडीआय सिटीमध्ये आपले नवीन घर बांधले होते. त्यांचे मामा महावीर यांनी सांगितले की, ते ३ दिवसांपूर्वी आशिषशी फोनवर बोलले. २३ ऑक्टोबरला आशिष रजा घेऊन नवीन घर पाहायला येणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते शहीद झाले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर