शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट

By हेमंत बावकर | Updated: October 21, 2020 14:11 IST

TET Exam for Teacher Job: सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते.

ठळक मुद्देअनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

सरकारी नोकरी ती देखील शिक्षकाची, हे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी बीएड, डीएड केले जाते. मात्र, वशिलेबाजीमुळे गरजवंत किंवा हुशार उमेदवार मागे राहतो आणि तिसराच व्यक्ती शिक्षक बनून जातो. ही पद्धत थांबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही परिक्षा शिक्षक झालेल्यांसाठी सक्तीची तसेच नव्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू लागली होती. यावर केंद्र सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे. 

सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. मात्र, आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एकदा का टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाली की त्या उमेदवाराला आयुष्यात कधीही पुन्हा टीईटी परिक्षा द्यावी लागणार नाही. 

अनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. बऱ्याच शिक्षकांना साधे पाढे येत नसल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले होते. तर अनेकांना इंग्रजी स्पेलिंग येत नसल्याचेही समोर आले होते. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमालीची ढासळली होती. उत्तर प्रदेश, बिहारमध्येतर शिक्षक भरतीचे मोठमोठे घोटाळे उघड झाले आहेत. 

टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे. यात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने टीईटी परिक्षा आयुष्यभरासाठी मान्य केली आहे. यामुळे सात वर्षे नोकरी न मिळाल्यास पुन्हा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा परिक्षा देण्याची वेळ उमेदवारांवर येणार नाही. 

नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नियम केंद्र सरकारसह राज्य सरकारांनाही लागू होणार आहेत. दोन्ही सरकारांच्या परिक्षा या एनसीटीई नियमांवरच होतात. केंद्र सरकारसाठी सीबीएसई आणि राज्य स्वत:च परिक्षा आयोजित करतात. या नव्या निर्णयाचा फायदा महिलांना होणार आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीexamपरीक्षाCentral Governmentकेंद्र सरकार