शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट

By हेमंत बावकर | Updated: October 21, 2020 14:11 IST

TET Exam for Teacher Job: सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते.

ठळक मुद्देअनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

सरकारी नोकरी ती देखील शिक्षकाची, हे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी बीएड, डीएड केले जाते. मात्र, वशिलेबाजीमुळे गरजवंत किंवा हुशार उमेदवार मागे राहतो आणि तिसराच व्यक्ती शिक्षक बनून जातो. ही पद्धत थांबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही परिक्षा शिक्षक झालेल्यांसाठी सक्तीची तसेच नव्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू लागली होती. यावर केंद्र सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे. 

सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. मात्र, आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एकदा का टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाली की त्या उमेदवाराला आयुष्यात कधीही पुन्हा टीईटी परिक्षा द्यावी लागणार नाही. 

अनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. बऱ्याच शिक्षकांना साधे पाढे येत नसल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले होते. तर अनेकांना इंग्रजी स्पेलिंग येत नसल्याचेही समोर आले होते. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमालीची ढासळली होती. उत्तर प्रदेश, बिहारमध्येतर शिक्षक भरतीचे मोठमोठे घोटाळे उघड झाले आहेत. 

टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे. यात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने टीईटी परिक्षा आयुष्यभरासाठी मान्य केली आहे. यामुळे सात वर्षे नोकरी न मिळाल्यास पुन्हा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा परिक्षा देण्याची वेळ उमेदवारांवर येणार नाही. 

नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नियम केंद्र सरकारसह राज्य सरकारांनाही लागू होणार आहेत. दोन्ही सरकारांच्या परिक्षा या एनसीटीई नियमांवरच होतात. केंद्र सरकारसाठी सीबीएसई आणि राज्य स्वत:च परिक्षा आयोजित करतात. या नव्या निर्णयाचा फायदा महिलांना होणार आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीexamपरीक्षाCentral Governmentकेंद्र सरकार