शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आता शाळा शिकविणार नाहीत मुघलांचा इतिहास, उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 07:28 IST

एनसीईआरटीची पुस्तके स्वीकारल्याने झाला बदल

लखनौ: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी उत्तर प्रदेश मंडळ आणि सीबीएसई मंडळाच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना यापुढे शाळांमध्ये मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. एनसीईआरटीने जून २०२२ मध्ये मुघल इतिहास, शीतयुद्ध इत्यादी प्रकरणे काढली होती. उत्तर प्रदेश मंडळाने एनसीईआरटीची पुस्तके आणि त्यांचा अभ्यासक्रम राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, आज किंवा या महिन्यात कोणताही नवीन धडा काढला नाही. यापूर्वी असे वृत्त होते की, उत्तर प्रदेश सरकारने इतिहासाच्या पुस्तकातून काही राज्यकर्ते आणि मुघल दरबारावरील धडे काढले आहेत. अकरावीच्या पुस्तकातून इस्लाम संस्कृतीचा उदय, संस्कृतींचा संघर्ष, औद्योगिक क्रांती, काळाची सुरुवात आदी धडे काढून टाकल्याचेही वृत्त होते. २०२० मध्ये सरकारने आग्रा येथील संग्रहालयाचे नाव  बदलल्यानंतर योगींनी ट्वीट केले होते की, ‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतीकांना स्थान नाही.

या आधीही घेतले अनेक निर्णय

मुघलांचे नाव आणि इतिहासाबाबत योगी सरकारने यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. २०२० मध्ये योगी सरकारने आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले. 

नागरिकशास्त्राच्या पुस्तकातही बदल

उपमुख्यमंत्री बृजेश पाठक म्हणाले की, लोक आपल्या संस्कृतीपासून वंचित होते, आम्ही लोकांना खरी संस्कृती सांगू. आता बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकलेल्या विषयांत ‘अकबरनामा’ (अकबराच्या कारकीर्दीचा अधिकृत इतिहास) व ‘बादशाहनामा’ (मुघल सम्राट शाहजहानचा इतिहास) समाविष्ट आहे. याशिवाय नागरिकशास्त्राच्या पुस्तकातही बदल करण्यात आले आहेत. स्वतंत्र भारतातील राजकारणाच्या पुस्तकातून जनआंदोलनांचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा काळ हा अध्यायही बदलण्यात आला आहे.

भाजप सरकार मुस्लिमांविरोधात जे काही काम करू शकते, ते सर्वकाही करत आहे; परंतु केवळ उत्तर प्रदेशातून मुघल राजवटीचा इतिहास काढून काही होणार नाही. हा इतिहास केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात मजबूत आहे. मुघल सम्राटांनी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेले. सरकारने जुनी इतिहासाची पुस्तकेही जप्त करावी, जेणेकरून काहीही पुरावा राहणार नाही. -नवाब इकबाल महमूद, माजी माध्यमिक शिक्षणमंत्री, आमदार, सपा

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशEducationशिक्षणMuslimमुस्लीम