देशात दररोज कोट्यवधी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. काही फ्लाईटने जातात, काही ट्रेनने जातात तर काही वैयक्तिक कारने प्रवास करतात. कुणीही आपले वाहन घेऊन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. सीमा ओलांडताच टोल टॅक्सही भरावा लागतो. भारतात हजाराहून जास्त टोलनाके आहेत. जिथे विविध वाहनांकडून टोल आकारले जातात.
याआधी लोक टोल भरण्यासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहत होते परंतु आता भारतात टोल भरण्यासाठी फास्टटॅगची व्यवस्था आहे. ज्यात विना अडथळा सहजपणे टोल भरून लोक पुढचा प्रवास करू शकतात. मात्र आता देशात नवीन टोल प्रणाली लागू होणार असल्याचे पुढे आले आहे. ज्यानुसार टोलची जुनी प्रणाली बदलली जाणार आहे.
किलोमीटरच्या हिशोबाने भरा टोल
सध्या भारतात कुठल्याही टोलनाक्यावर एखादा वाहन जात असेल तर त्यांच्या फास्टटॅगमधून एक ठराविक रक्कम कापली जाते. परंतु आता भारतात नव्या टोल पॉलिसीवर काम सुरू झाले आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून देशात नवीन टोल प्रणाली सुरू करण्यावर काम सुरू आहे. या नव्या टोल प्रणालीनुसार वाहनांना किलोमीटरच्या हिशोबाने टोल भरता येईल. कोणते वाहन किती किलोमीटर चालले त्या हिशोबाने बँक खात्यातून पैसे कापले जाणार आहेत. सध्या ही नवीन पॉलिसी कधी लागू होणार याबाबत सरकारकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. ET ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
कसं काम नवीन टोल पॉलिसी?
नव्या टोल पॉलिसीनुसार सर्व टोलनाक्यावर फास्टटॅग आणि कॅमेरे लावले जातील. ज्याअंतर्गत टोल थेट वाहन मालकाच्या बँक खात्यातून जाईल. या पॉलिसीत ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन म्हणजे एएनपीआर टेक्नोलॉजी बेस्ड एडवान्स सिस्टम तयार केली जाईल. त्याशिवाय सरकार वार्षिक फास्टटॅग रिचार्ज आणण्याचा विचार करत आहे. ज्यात वाहन मालकांना वर्षातून एकदाच फास्टटॅग रिचार्ज करावा लागेल आणि त्यातून वर्षभर हवा तेवढा प्रवास करता येईल.