शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 01:24 IST

पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि मुल्तान ही महत्वाची शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांवरच अवलंबून आहेत.

काश्मिर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आत भारताने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर, बुधवारी झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत, 1960 साली झालेला सिंधू जल करार तत्कळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर सिंधू नदी ही पाकिस्तानची लाइफ लाइन म्हणून ओळखळी जाते. सिंदू नदी आणि तिच्या उपनद्या भारतातूनचपाकिस्तानात जातात. यामुळे या नद्यांचे पाणी भारताने नियत्रित केल्यास, पाकिस्तानातील जनता पाण्याच्या थांबा-थेंबासाठी तरसेल. सिंधू आणि तिच्या उपनद्या चार देशांतून वाहतात. एवढेच नाही तर, 21 कोटीहून अधिक लोकसंख्येचे जीवन याच नद्यांवर अवलंबून आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पाकिस्तानात हाहाकार माजेल... -सिंधूनदी ही पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाची नदी आहे. कारण पाकिस्तानातील 80 टक्के शेती (16 मिलियन हेक्टेयर) ही सिंधू नदी प्रणालीवरच अवलंबून आहे. या पाण्यापैकी 93 टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते. याशिवाय शेती अशक्य आहे. या नदीमुळे 237 मिलियन हून अधिक लोकांचे पालनपोषण होते. यात पाकिस्तानातील सिंधू खोऱ्यामधील ६१ टक्के लोकसंख्येचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि मुल्तान ही महत्वाची शहरे सिंधू आणि तिच्या उपनद्यांवरच अवलंबून आहेत.

याशिवाय, पाकिस्तानातील तरबेला आणि मंगला सारखे पॉवर प्रोजेक्ट्स याच न्यांवर अवलंबून आहेत. सिंधू जल करार स्थगित झाल्याने, पाकिस्तानात अन्न-धान्य उत्पादनात घट होऊ शकते. यामुळे लाखो लाकांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. एवढेच नाही तर या कराराच्या स्थगितीने पाकिस्तानातील शहरी भागाला होणारा पाणी पुरवठ थांबेल, यामुळे तेथे हाहाकार माजेल. तसेच, यामुळे वीज उत्पादन ठप्प होईल. परिणामी उद्योग आणि शहरी भागांत अंधार पसरेल.

काय आहे सिंधू जल करार? -भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती लष्करी जनरल अयुब खान यांच्यात सप्टेंबर १९६० मध्ये सिंधू जल करार झाला होता. ६२ वर्षांपूर्वी झालेल्या या करारांतर्गत, भारताला सिंधू आणि तिच्या उपनद्यांमधून १९.५ टक्के पाणी मिळते. तर पाकिस्तानला सुमारे ८० टक्के पाणी मिळते. भारत आपल्या पाण्याच्या केवळ ९० टक्के पाण्याचाच वापर करतो. या करारात १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू खोऱ्यातील ६ नद्यांचे विभाजन झाले. महत्वाचे म्हणजे, या करारांतर्गत, दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी सिंधू जल आयोगाची बैठक होणे बंधनकारक आहे. 

सिंधू जल करारासंदर्भातील मागची बैठक 30-31 मे 2022 रोजी नवी दिल्ली येथे झाली  होती. पू्र्वेकडील नद्यांवर भारताचा अधिकार आहे. तर पश्चिमेकडील नद्या पाकिस्तानच्या अधिकारक्षेत्रात देण्यात आल्या आहेत. या करारानुसार, भारताला रावी, बियास आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी मिळते. तर पाकिस्तानला चिनाब, झेलम आणि सिंधू या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी मिळते. या नद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तान दोघांसाठीही महत्वाचे आहे. या कराराच्या स्थगितीनंतर, भारत पाकिस्तानात जाणारा सिंधू नदीचा जल प्रवाह रोखेल. परिणामी पाकिस्तानात पाण्याच्या एका-एका थेंबासाठीही तरसेल. यामुळे हा करार स्थगित होणे पाकिस्तानला महागात पडू शकते.

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला