शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आता पै न् पै येतेय गरिबांच्या खात्यात! २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:12 IST

"देशातील गरिबी कमी झाली, अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप"

भोपाळ : २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग होते. गरिबांचे हक्क व पैशांची लूट सुरू होती. मात्र, आता पै न् पै त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.

निती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत मोदी म्हणाले की, मागील पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतून बाहेर आले आहेत. मोठ्या संख्येने लोक कर भरत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आपल्या पैशांचा सरकारकडून चांगला उपयोग होत असल्याचा विश्वास लोकांत निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटाकडे जात आहेत. सर्व क्षेत्रांना बळ मिळण्यासह रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. 

नागरिकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. आपला एक-एक पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल, या विश्वासाने ते कर जमा करायला पुढे येत आहेत.

अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप

देशाची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगातील १०व्या स्थानावरून आता ५व्या स्थानावर गेली आहे. गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. २०१४ नंतर भारतात पाच लाख नवीन सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

देशातील गरिबी कमी झाली

  • मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सीएम राईझ शासकीय महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षण-सह-अभिमुखता कार्यक्रमाला मोदी डिजिटल माध्यमातून संबोधित करत होते. 
  • अमृत काळच्या पहिल्याच वर्षात सकारात्मक वृत्तांचा वर्षाव  सुरू झाला आहे. ही वृत्ते देशातील घटती गरिबी आणि वाढती समृद्धी दर्शवतात, असेही ते म्हणाले.

पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) श्रेणीतून बाहेर आले आहेत. आयकर परताव्याच्या संख्येवरून असे दिसून येते की, भारतीयांचे सरासरी उत्पन्न २०१४ मधील ४ लाख रुपयांवरून गेल्या नऊ वर्षांत १३ लाख रुपये झाले आहे.- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी