शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

आता पै न् पै येतेय गरिबांच्या खात्यात! २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:12 IST

"देशातील गरिबी कमी झाली, अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप"

भोपाळ : २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग होते. गरिबांचे हक्क व पैशांची लूट सुरू होती. मात्र, आता पै न् पै त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.

निती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत मोदी म्हणाले की, मागील पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतून बाहेर आले आहेत. मोठ्या संख्येने लोक कर भरत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आपल्या पैशांचा सरकारकडून चांगला उपयोग होत असल्याचा विश्वास लोकांत निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटाकडे जात आहेत. सर्व क्षेत्रांना बळ मिळण्यासह रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. 

नागरिकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. आपला एक-एक पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल, या विश्वासाने ते कर जमा करायला पुढे येत आहेत.

अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप

देशाची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगातील १०व्या स्थानावरून आता ५व्या स्थानावर गेली आहे. गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. २०१४ नंतर भारतात पाच लाख नवीन सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

देशातील गरिबी कमी झाली

  • मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सीएम राईझ शासकीय महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षण-सह-अभिमुखता कार्यक्रमाला मोदी डिजिटल माध्यमातून संबोधित करत होते. 
  • अमृत काळच्या पहिल्याच वर्षात सकारात्मक वृत्तांचा वर्षाव  सुरू झाला आहे. ही वृत्ते देशातील घटती गरिबी आणि वाढती समृद्धी दर्शवतात, असेही ते म्हणाले.

पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) श्रेणीतून बाहेर आले आहेत. आयकर परताव्याच्या संख्येवरून असे दिसून येते की, भारतीयांचे सरासरी उत्पन्न २०१४ मधील ४ लाख रुपयांवरून गेल्या नऊ वर्षांत १३ लाख रुपये झाले आहे.- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी