शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आता पै न् पै येतेय गरिबांच्या खात्यात! २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 12:12 IST

"देशातील गरिबी कमी झाली, अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप"

भोपाळ : २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग होते. गरिबांचे हक्क व पैशांची लूट सुरू होती. मात्र, आता पै न् पै त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.

निती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत मोदी म्हणाले की, मागील पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतून बाहेर आले आहेत. मोठ्या संख्येने लोक कर भरत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आपल्या पैशांचा सरकारकडून चांगला उपयोग होत असल्याचा विश्वास लोकांत निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटाकडे जात आहेत. सर्व क्षेत्रांना बळ मिळण्यासह रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. 

नागरिकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे. आपला एक-एक पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल, या विश्वासाने ते कर जमा करायला पुढे येत आहेत.

अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप

देशाची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगातील १०व्या स्थानावरून आता ५व्या स्थानावर गेली आहे. गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. २०१४ नंतर भारतात पाच लाख नवीन सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

देशातील गरिबी कमी झाली

  • मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सीएम राईझ शासकीय महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षण-सह-अभिमुखता कार्यक्रमाला मोदी डिजिटल माध्यमातून संबोधित करत होते. 
  • अमृत काळच्या पहिल्याच वर्षात सकारात्मक वृत्तांचा वर्षाव  सुरू झाला आहे. ही वृत्ते देशातील घटती गरिबी आणि वाढती समृद्धी दर्शवतात, असेही ते म्हणाले.

पाच वर्षांत साडेतेरा कोटी भारतीय बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) श्रेणीतून बाहेर आले आहेत. आयकर परताव्याच्या संख्येवरून असे दिसून येते की, भारतीयांचे सरासरी उत्पन्न २०१४ मधील ४ लाख रुपयांवरून गेल्या नऊ वर्षांत १३ लाख रुपये झाले आहे.- नरेंद्र माेदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी