शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आता रेल्वे स्थानकांच्या टेरेसवर होणार मॉल अन् बरंच काही, मोदी सरकारचा जबरदस्त प्लान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 09:16 IST

देशातील कोणत्याही शहराच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर प्रवास करणे अधिक सोपे होते.

देशातील कोणत्याही शहराच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या तर प्रवास करणे अधिक सोपे होते. यावेळी मोदी सरकारचे मुख्य लक्ष भारतीय रेल्वेवर आहे. आगामी काळात देशातील रेल्वे स्थानके लोक पाहत राहतील अशा पद्धतीनं विकसित केली जाणार आहेत. रेल्वे स्थानकांच्या टेरेसवर लोकांना मॉलसारखा अनुभव मिळेल, अशी कल्पना पंतप्रधानांनी दिल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. येथे प्रवाशांना सर्व प्रकारच्या हायटेक सुविधा मिळतील.

गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता रेल्वे स्थानकांचे स्वरूप बदलणार आहे. रेल्वे स्थानकांचा विमानतळाप्रमाणे विकास केला जाईल. विमानतळाप्रमाणेच स्थानकात प्रवेश आणि बाहेर जाण्याचे वेगवेगळे मार्ग तर असतीलच, शिवाय स्थानकाच्या बाहेरील भागातील ट्राफीकपासूनही लोकांची सुटका होईल. त्याचवेळी २०२६ पर्यंत देशात बुलेट ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

शहराच्या मध्यभागी आकर्षक आणि नागरी सुविधांसाठीची जागा म्हणून पंतप्रधानांनी रूफ प्लाझाची संकल्पना कशी मांडली हे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आपल्याला ५० वर्षे पुढचा विचार करायचा आहे, असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं वैष्णव म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला आम्हाला ५० स्थानकांचे लक्ष्य दिले होते. मी त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं आणि २ तासांहून अधिक काळ प्रेझंटेशन देऊनही पंतप्रधान मोदी समाधानी झाले नाहीत. त्यांनी संध्याकाळी नंतर फोन केला की डिझाइन सध्यासाठी योग्य आहे, परंतु आपल्याला पुढच्या ५० वर्षांसाठीचा विचार करावा लागेल असं म्हटल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

रेल्वेची क्षमता वेगानं वाढणाररेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशात वेगाने होत असलेल्या या जागतिक दर्जाच्या बदलांमागे पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. पंतप्रधान कोणतेही काम भविष्य डोळ्यासमोर ठेवून करतात. भविष्यात कोणत्या प्रकारच्या गरजा असतील, त्यानुसार विकासकामे केल्याने पंतप्रधानांची उत्तम विचारसरणी दिसून येते. पंतप्रधानांचे लक्ष रेल्वेवर असून आगामी काळात रेल्वेची क्षमता झपाट्याने वाढणार आहे. वंदे भारत ट्रेनबद्दल ते म्हणाले की, जगातील सर्वोत्तम ट्रेनपेक्षाही अनेक पॅरामीटर्समध्ये ती चांगली आहे.

रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझारेल्वे मंत्र्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांनी रेल्वे स्थानके अगदी सहजतेने आधुनिकतेने जोडण्याची सूचना केली आहे. रेल्वे स्थानकांवर रुफ टॉप प्लाझा असावं अशी पंतप्रधानांचं व्हिजन आहे. या ठिकाणी वेटिंग एरिया, स्थानिक वस्तू विकण्याची सोय, फूड कोर्ट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असावी, असा त्यांचा मानस आहे. पंतप्रधान मोदींनी रेल्वे स्थानकांबाबत एक मोठी सूचना दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की रेल्वे स्थानकं सामान्यतः शहराच्या दोन भागांमध्ये बांधली जातात. जे एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत नाहीत. अशा स्थितीत शहराचे दोन्ही भाग जोडले जातील अशा पद्धतीने स्थानकांची रचना करावी. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे