शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

प्रवासी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला; हजारो प्रवाशांवर थेट परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 19:49 IST

दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं घेतला महत्त्वाचा निर्णय; हजारो प्रवाशांना फटका बसणार

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेनं नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. रेल्वे प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचा फटका हजारो प्रवाशांना बसणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. बंगळुरू मिररनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वेनं हा निर्णय घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा वापर करता येणार नाही.रेल्वेने विकसित केला एसी-३ इकॉनॉमिक कोच खास, माफक तिकिटात सुविधा मिळणार हाय क्लास१३ मार्चला दिल्ली-देहरादून शताब्दी एक्स्प्रेसमध्ये भीषण आग लागली होती. एका डब्यात लागलेली आग बघता बघता सात डब्यांपर्यंत पोहोचली. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर रेल्वेनं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं टाकण्यास सुरुवात केली.धुम्रपानाविरोधात रेल्वे प्रशासन कठोरधुम्रपानाविरोधातले नियमदेखील रेल्वेकडून आणखी कठोर करण्यात येणार आहेत. रेल्वेत धुम्रपान करणाऱ्यांकडून सध्या कलम १६७ च्या अंतर्गत केवळ १०० रुपये दंड आकारला जातो. हा दंड वाढवणाऱ्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे गाड्या किंवा रेल्वे स्थानकांच्या परिसराात धुम्रपान करणाऱ्यांसाठी थेट तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचारदेखील सुरू आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे