शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अब मेरे पास भाई नहीं है । - अमिताभ बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 12:54 IST

शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला असून भावनिक झाले आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील एकेकाळची प्रसिद्ध जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि शशी कपूर. दिवार चित्रपटात सख्ख्या भावांची भूमिका निभावणारे हे दोघे दिग्गज अभिनेते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. पण दिवारमधील त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. दोघांमधील जुगलबंदी प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतली होती. शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला असून भावनिक झाले आहेत. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. अमिताभ यांनी रुमी जाफरी यांच्या एका शेरपासून आपल्या ब्लॉगची सुरुवात केली आहे. 

'हम ज़िंदगी को अपनी कहां तक सम्भालते इस क़ीमती किताब का काग़ज़ ख़राब था'  

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिली आहे की, 'आपके बबुआ की तरफ से शशि जी'. शशी कपूर प्रेमाने अमिताभ बच्चन यांनी 'बबुआ' म्हणत असत. 

ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. आपण कशाप्रकारे शशी कपूर यांच्यापासून प्रभावित होतो, त्यांची हेअरस्टाईल, वागणं कसं कॉपी करायचो हे अमिताभ यांनी सांगितलं आहे. शशी कपूर यांचे कुरळे केस ज्याप्रकारे त्यांचं कपाळ आणि कानावर परसरलेल असायचे ते आपल्याला प्रचंड आवडायचं.  

पत्नी जेनिफर यांच्या मृत्यूनंतर शशी कपूर कशाप्रकारे एकटे पडले होते याबद्दलही अमिताभ बच्चन बोलले आहेत. आजारांशी लढणा-या शशी कपूर यांच्याकडे पाहून आपण खूप काही शिकलो असल्याचं अमिताभ बोलतात. 75 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी सांगितलं आहे की, कशाप्रकारे प्रत्येक भेटीत शशी कपूर आणि आपली मैत्री घट्ट होत गेली. 

अमिताभ यांनी लिहिलं आहे की, जेव्हा त्यांना आपल्या प्रिय मित्राच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा ते रुग्णालयात गेले नाहीत. मी फक्त एकदा रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्यानंतर कधीच गेलो नाही. 'मी कधीच गेलो नाही. माझ्या प्रिय मित्राला रुग्णालयात अशाप्रकारे पडून राहिलेलं पाहण्याची माझी इच्छा नव्हती, आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मला मिळाली, तेव्हादेखील मी रुग्णालयात गेलो नाही'. अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या रायसोबत त्यांच्या घरी गेले होते. 

अमिताभ पुढे लिहितात की, 'शशी कपूर यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने लेखक रुमी जाफरी यांनी मला हा शेर पाठवला, जो वरती लिहिला आहे'. 'शशी कपूर मला नेहमी बबुआ म्हणायचे...आज माझ्यासोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक पाने कोरीच राहिली', असं अमिताभ यांनी सांगितलं आहे. 

अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, 'जेव्हा मी 60 च्या दशकात चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होतो, तेव्हा शशी कपूर यांचा फोटो पहिल्यांदा पाहिला होता. मॅगजीनमध्ये छापण्यात आलेल्या त्यांच्या फोटोसोबत लिहिलं होतं की, राज कपूर आणि शम्मी कपूर यांचा छोटा भाऊ लवकरच पदापर्ण करणार आहे'. हे वाचल्यानंतर अभिनेता बनण्याची इच्छा असणारे अमिताभ विचार करु लागले की, जर असे लोक जवळपास असतील, तर मग आपला काहीच चान्स नाही. 

शशी कपूर यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. आज मेरे पास मां है ! हा त्यांचा सुपरहिट डायलॉग. हा फक्त एक डायलॉग नसून चित्रपटसृष्टीच्या इतिहासाच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आहे. आज मेरे पास मां है ! म्हणणारे शशी कपूर आज आपल्यात नसल्याने अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. आपल्या भावासारखा मित्र गमावणारे अमिताभ म्हणतायत, अब मेरे पास भाई नहीं है। 

ब्लॉग वाचण्यासाठी 

टॅग्स :Shashi Kapoorशशी कपूरAmitabh Bachchanअमिताभ बच्चनbollywoodबॉलीवूड