शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

आता पानटपरीवर 'या' गोष्टी मिळणं बंद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 5:45 PM

आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 

मुंबई - केंद्र सरकारने एक प्रस्ताव सादर केला असून तो लागू केल्यास पानटपरीवर सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट आणि चॉकलेट मिळणं बंद होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंचं उत्पादन (एफएमसीजी) करणा-या कंपन्यांसाठी ही वाईट बातमी असून त्यांना प्रचंड मोठा तोटा होऊ शकतो. प्रस्ताव लागू झाल्यास विक्रीत खूप मोठी घट होईल असा दावा एफएमसीजी कंपन्यांनी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पानटपरीवर चिप्स, बिस्किट आणि सॉफ्ट ड्रिंकसारख्या वस्तू विकण्यावर बंदी आणली गेली पाहिजे असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, लहान मुलं आणि जे लोक तंबाखूजन्य पदार्थांचा उपयोग करत नाही त्यांना या निर्णयामुळे फायदा होईल. तंबाखूजन्य गोष्टींच्या संपर्कात येण्यापासून आणि त्यांच्या धोक्यापासून त्यांना वाचवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

स्नॅक्स तसंच बिस्कीटचं उत्पादन करणा-या पार्ले कंपनीचे विभाग प्रमुख कृष्ण राव यांचं म्हणणं आहे की, 'नुकसान पोहोचवणा-या गोष्टींपासून वाचवण्यासाठी पानटपरीवर दुस-या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणणं योग्य नाही'. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये पानटपरीचा वाटा जवळपास 15 ते 25 टक्के आहे. 

राव यांनी सांगितलं आहे की, 'देशभरात जवळपास 25 लाख पानटपरीची दुकां आहेत. या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. आमच्यासाठी याचा अंदाज लावणंही शक्य नाही'. एफएमसीजी कंपन्यांच्या एकूण विक्रीत पानटपरी दुकानांचा आठ ते दहा टक्के वाटा आहे. इतकाच वाटा मॉडर्न रिटेलचाही आहे. 

केंद्र सरकारने राज्य सरकारांना संपर्क करत लहान मुलांना तंबाखूजन्य गोष्टींपासून लांब कसं ठेवलं जाऊ शकतं यासंबंधी विचारणा केली आहे. एका सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार अद्याप उत्तराची वाट पाहत आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, 'नुकतंच यासंबंधी पत्र राज्य सरकारांना पाठवण्यात आलं आहे. असे काही उपाय करण्याची गरज आहे ज्यामुळे लहान मुलांना तंबाखूजन्य गोष्टींपासून दूर ठेवण्यात मदत होईल. उदाहरण द्यायचं झालं तर, त्यांच्यासाठी वेगळं काऊंटर ठेवलं जाऊ शकतं'.