शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

आता पानटपरीवर 'या' गोष्टी मिळणं बंद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:51 IST

आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 

मुंबई - केंद्र सरकारने एक प्रस्ताव सादर केला असून तो लागू केल्यास पानटपरीवर सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट आणि चॉकलेट मिळणं बंद होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंचं उत्पादन (एफएमसीजी) करणा-या कंपन्यांसाठी ही वाईट बातमी असून त्यांना प्रचंड मोठा तोटा होऊ शकतो. प्रस्ताव लागू झाल्यास विक्रीत खूप मोठी घट होईल असा दावा एफएमसीजी कंपन्यांनी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पानटपरीवर चिप्स, बिस्किट आणि सॉफ्ट ड्रिंकसारख्या वस्तू विकण्यावर बंदी आणली गेली पाहिजे असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, लहान मुलं आणि जे लोक तंबाखूजन्य पदार्थांचा उपयोग करत नाही त्यांना या निर्णयामुळे फायदा होईल. तंबाखूजन्य गोष्टींच्या संपर्कात येण्यापासून आणि त्यांच्या धोक्यापासून त्यांना वाचवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

स्नॅक्स तसंच बिस्कीटचं उत्पादन करणा-या पार्ले कंपनीचे विभाग प्रमुख कृष्ण राव यांचं म्हणणं आहे की, 'नुकसान पोहोचवणा-या गोष्टींपासून वाचवण्यासाठी पानटपरीवर दुस-या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणणं योग्य नाही'. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये पानटपरीचा वाटा जवळपास 15 ते 25 टक्के आहे. 

राव यांनी सांगितलं आहे की, 'देशभरात जवळपास 25 लाख पानटपरीची दुकां आहेत. या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. आमच्यासाठी याचा अंदाज लावणंही शक्य नाही'. एफएमसीजी कंपन्यांच्या एकूण विक्रीत पानटपरी दुकानांचा आठ ते दहा टक्के वाटा आहे. इतकाच वाटा मॉडर्न रिटेलचाही आहे. 

केंद्र सरकारने राज्य सरकारांना संपर्क करत लहान मुलांना तंबाखूजन्य गोष्टींपासून लांब कसं ठेवलं जाऊ शकतं यासंबंधी विचारणा केली आहे. एका सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार अद्याप उत्तराची वाट पाहत आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, 'नुकतंच यासंबंधी पत्र राज्य सरकारांना पाठवण्यात आलं आहे. असे काही उपाय करण्याची गरज आहे ज्यामुळे लहान मुलांना तंबाखूजन्य गोष्टींपासून दूर ठेवण्यात मदत होईल. उदाहरण द्यायचं झालं तर, त्यांच्यासाठी वेगळं काऊंटर ठेवलं जाऊ शकतं'.