शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आता पानटपरीवर 'या' गोष्टी मिळणं बंद होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:51 IST

आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 

मुंबई - केंद्र सरकारने एक प्रस्ताव सादर केला असून तो लागू केल्यास पानटपरीवर सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट आणि चॉकलेट मिळणं बंद होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंचं उत्पादन (एफएमसीजी) करणा-या कंपन्यांसाठी ही वाईट बातमी असून त्यांना प्रचंड मोठा तोटा होऊ शकतो. प्रस्ताव लागू झाल्यास विक्रीत खूप मोठी घट होईल असा दावा एफएमसीजी कंपन्यांनी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने 21 सप्टेंबर रोजी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारांना अशी व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आलं आहे की, ज्यानुसार दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असेल. 

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पानटपरीवर चिप्स, बिस्किट आणि सॉफ्ट ड्रिंकसारख्या वस्तू विकण्यावर बंदी आणली गेली पाहिजे असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, लहान मुलं आणि जे लोक तंबाखूजन्य पदार्थांचा उपयोग करत नाही त्यांना या निर्णयामुळे फायदा होईल. तंबाखूजन्य गोष्टींच्या संपर्कात येण्यापासून आणि त्यांच्या धोक्यापासून त्यांना वाचवण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

स्नॅक्स तसंच बिस्कीटचं उत्पादन करणा-या पार्ले कंपनीचे विभाग प्रमुख कृष्ण राव यांचं म्हणणं आहे की, 'नुकसान पोहोचवणा-या गोष्टींपासून वाचवण्यासाठी पानटपरीवर दुस-या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणणं योग्य नाही'. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये पानटपरीचा वाटा जवळपास 15 ते 25 टक्के आहे. 

राव यांनी सांगितलं आहे की, 'देशभरात जवळपास 25 लाख पानटपरीची दुकां आहेत. या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. आमच्यासाठी याचा अंदाज लावणंही शक्य नाही'. एफएमसीजी कंपन्यांच्या एकूण विक्रीत पानटपरी दुकानांचा आठ ते दहा टक्के वाटा आहे. इतकाच वाटा मॉडर्न रिटेलचाही आहे. 

केंद्र सरकारने राज्य सरकारांना संपर्क करत लहान मुलांना तंबाखूजन्य गोष्टींपासून लांब कसं ठेवलं जाऊ शकतं यासंबंधी विचारणा केली आहे. एका सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार अद्याप उत्तराची वाट पाहत आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, 'नुकतंच यासंबंधी पत्र राज्य सरकारांना पाठवण्यात आलं आहे. असे काही उपाय करण्याची गरज आहे ज्यामुळे लहान मुलांना तंबाखूजन्य गोष्टींपासून दूर ठेवण्यात मदत होईल. उदाहरण द्यायचं झालं तर, त्यांच्यासाठी वेगळं काऊंटर ठेवलं जाऊ शकतं'.