शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

आता मणिपूरमधून होणार घुसखोरांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:51 IST

१९५१ नंतर आलेले मूळचे नागरिक मानणार नाही

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : स्थलांतरित कुटुंबे किंवा घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने राष्टÑीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) कार्यवाही सुरू केल्यानंतर, आता ईशान्येकडील मणिपूरमधील भाजपा सरकारनेही घुसखोरांची हकालपट्टी करून, मूळच्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारे मणिपूर जनता विधेयक संमत केले आहे.त्यानुसार, १९५१ नंतर आलेल्यांना मणिपूरचे मूळ नागरिक मानले जाणार नाही. त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. राज्यात संपत्ती उभी करण्यास व वास्तव्यही करण्यासही निर्बंध घालण्यात येणार आहेत. मूळचे रहिवासी मणिपूरचे नसलेल्या लोकांनी ठरलेल्या मुदतीमध्ये विशेष प्रवेश परवाना घ्यावा, असे या विधेयकात आहे. याला केवळ राज्यपालांची मंजुरी मिळणे बाकी आहे. या विधेयकामुळे मोदी सरकार द्विधा स्थितीत सापडले असून, राज्यपाल नजमा हेपतुल्ला यासुद्धा चिंतेत असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्र सरकारला या स्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. तथापि, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे मात्र विधेयकासाठी आग्रही आहेत.व्यापाऱ्यांना गाशा गुंडाळावा लागेलया विधेयकामुळे बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्या अवैध कुटुंबासह १९६० आणि १९७० च्या दशकांत मुंबई, पश्चिम बंगाल, राजस्थानातून व्यापार उद्योगासाठी आलेले हजारो व्यापारी, व्यावसायिक, तसेच कामगारांनाही गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापारी भीतीच्या छायेत आहेत.मूळचे मणिपुरी कसे ठरवणार?मणिपूरमध्ये १९५१ची राष्टÑीय नागरिक नोंदणीच नाही. तेव्हा १९५१चे मूळचे मणिपुरी कोण? हे कसे ठरविणार, याचे उत्तरही मुख्यमंत्र्यांकडे नाही. यामुळे भाजपाला येथे प्राबल्य असलेल्या समुदायाच्या बळावर लोकसभा, विधानसभेच्या बव्हंशी जागा मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठीला पटवून दिल्याचे समजते.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी